बुधवार, २८ डिसेंबर, २०११
उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य
उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री ४२ राजेश्वरी राजमहाल सोडून निघून गेली,सगळ्यांनाच नवल वा...
सोमवार, २६ डिसेंबर, २०११
किल्ल्याचे रहस्य
श्री ४२
राजेश्वरी राजमहाल सोडून निघून गेली,सगळ्यांनाच नवल वाटलं .कुठली कोण हातावर पोट असलेल्या बापाची मुलगी अचानक राणी होणार ते भाग्य लाथाडून ही गेलीच कशी ?सुजयराजांचा चेहेरा पण उतरला होता.त्यांनी जरी राजेश्वरीला निर्णयाचा अधिकार दिला असला तरी त्यांना मनातून खात्री होती की नकार मिळणार नाही.मग ही अशी तडका फडकी निघून कशी गेली?रघुनाथला तर मेल्याहून मेल्या सारखे झाले होते.राजेश्वरीच्या विचित्र वागण्याचा त्याला जरी अनुभव होता तरी आयुष्यातली इतकी मोठी संधी ती अश्याप्रकारे ठोकरून लावेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.त्याला तिथून एकाएकी निघून पण जाता येत नव्हते.सगळ्यात आधी सावरला तो राजांचा एक इंग्रज मित्र,त्याने सुजय राजांना राधाकृष्णाच्या चित्रापुढे आणून उभे केले.राजेश्वरीने लाल अन पांढऱ्या दोन्ही रंगांची फुलं चित्रापुढे ठेवली होती. डोळ्यातल्या पाण्यामुळे धूसर दिणारे दृश्य सुजयराजांनी डोळ्यातले पाणी निपटून नीट बघितले.पूर्ण नकार नव्हता तर !त्यांच्या चेहेऱ्यावर पुन्हा नेहेमीचेच स्मित दिसू लागले. त्यांचा मित्र पण आनंदाने त्यांच्या पाठीवर थोपटू लागला.रघुनाथला हे काहीच समजले नव्हते सुजय राजांनी त्याला जायची परवानगी दिली अन रात्री भेटतो असे हळू आवाजात सांगितले.
राजमहालातून रघुनाथ तडक खोलीवर आला.थोड्या रागानेच त्याने हाक मारली राजेश्वरीला पण तिथे कुणीच नव्हते ही मुलगी आता गेली तरी कुठे ?रघुनाथ तिथेच खाली बसला.आज रघुनाथ तिला शोधायला जाणार नव्हता.त्याच्या पायात बळच उरलं नव्हतं.कुठून सुंदरपुरला यायची बुद्धी झाली असे आता त्याला वाटू लागले होते.
सगळ्या मित्रांचा निरोप घेऊन सुजयराजे घाईने निघाले.कधी एकदा राजेश्वरीला भेटतो असे झाले होते.खोलीकडे जाता जाता ते एकदम सौधाच्या दिशेने चालू लागले.राजांचा अंदाज अगदी बरोबर होता.राजेश्वरी एकटीच सौधावर उभी होती, हीच त्यांना हवी अशी अनुकूल संधी होती.सुजयराजांना तिथे बघून राजेश्वरीला अजिबात आश्चर्य वाटले नाही,जणूकाय दोघांचे आधीपासूनच भेटायचे ठरले होते. ती फक्त इतकेच म्हणाली माझे काही प्रश्न आहेत ज्यांची मला उत्तरं हवी आहे.सुजयराजे म्हणाले मी माखनला बोलावून घेतो,त्यावर राजेश्वरीने त्यांना सांगितले की माझ्या प्रश्नांची उत्तरं ह्याच राजमहालात सापडतील असे वाटते फक्त मला इथे माझ्या मनाप्रमाणे फिरण्याची मुभा द्यावी.सुजयराजे लगेच तयार झाले,फक्त तळघरात जाताना माखन किंवा केशर बरोबर असेल अशी काळजी घ्यायला सांगितले,राजेश्वरीच्या जीवाला धोका होऊ शकतो असे स्पष्टीकरण राजांनी दिले,थोड्याश्या अनिच्छेनी राजेश्वरीने होकार दिला.सुजयराजे अनिमिष नेत्रांनी राजेश्वरीकडे बघत होते.गडद अंधारात सुद्धा त्यांच्या नजरेनी राजेश्वरी अस्वस्थ झाली होती.ही भावना तिच्या करता सर्वस्वी नवीन होती,पण अजून तिला त्यात पुरतेपणी झोकून देता येत नव्हते कारण राणी सुकन्याचा चिरका,चिडका आवाज तिच्या कानात घुमत होता,"त्या सुजय राजाला चांगले पन्नास फटके मारा"का ? कश्याकरता पन्नास फटके मारायला निघाली होती ती ? हे गूढ उकलल्याशिवाय पुढचा विचार नको.
सौ.उषा.
राजेश्वरी राजमहाल सोडून निघून गेली,सगळ्यांनाच नवल वाटलं .कुठली कोण हातावर पोट असलेल्या बापाची मुलगी अचानक राणी होणार ते भाग्य लाथाडून ही गेलीच कशी ?सुजयराजांचा चेहेरा पण उतरला होता.त्यांनी जरी राजेश्वरीला निर्णयाचा अधिकार दिला असला तरी त्यांना मनातून खात्री होती की नकार मिळणार नाही.मग ही अशी तडका फडकी निघून कशी गेली?रघुनाथला तर मेल्याहून मेल्या सारखे झाले होते.राजेश्वरीच्या विचित्र वागण्याचा त्याला जरी अनुभव होता तरी आयुष्यातली इतकी मोठी संधी ती अश्याप्रकारे ठोकरून लावेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.त्याला तिथून एकाएकी निघून पण जाता येत नव्हते.सगळ्यात आधी सावरला तो राजांचा एक इंग्रज मित्र,त्याने सुजय राजांना राधाकृष्णाच्या चित्रापुढे आणून उभे केले.राजेश्वरीने लाल अन पांढऱ्या दोन्ही रंगांची फुलं चित्रापुढे ठेवली होती. डोळ्यातल्या पाण्यामुळे धूसर दिणारे दृश्य सुजयराजांनी डोळ्यातले पाणी निपटून नीट बघितले.पूर्ण नकार नव्हता तर !त्यांच्या चेहेऱ्यावर पुन्हा नेहेमीचेच स्मित दिसू लागले. त्यांचा मित्र पण आनंदाने त्यांच्या पाठीवर थोपटू लागला.रघुनाथला हे काहीच समजले नव्हते सुजय राजांनी त्याला जायची परवानगी दिली अन रात्री भेटतो असे हळू आवाजात सांगितले.
राजमहालातून रघुनाथ तडक खोलीवर आला.थोड्या रागानेच त्याने हाक मारली राजेश्वरीला पण तिथे कुणीच नव्हते ही मुलगी आता गेली तरी कुठे ?रघुनाथ तिथेच खाली बसला.आज रघुनाथ तिला शोधायला जाणार नव्हता.त्याच्या पायात बळच उरलं नव्हतं.कुठून सुंदरपुरला यायची बुद्धी झाली असे आता त्याला वाटू लागले होते.
सगळ्या मित्रांचा निरोप घेऊन सुजयराजे घाईने निघाले.कधी एकदा राजेश्वरीला भेटतो असे झाले होते.खोलीकडे जाता जाता ते एकदम सौधाच्या दिशेने चालू लागले.राजांचा अंदाज अगदी बरोबर होता.राजेश्वरी एकटीच सौधावर उभी होती, हीच त्यांना हवी अशी अनुकूल संधी होती.सुजयराजांना तिथे बघून राजेश्वरीला अजिबात आश्चर्य वाटले नाही,जणूकाय दोघांचे आधीपासूनच भेटायचे ठरले होते. ती फक्त इतकेच म्हणाली माझे काही प्रश्न आहेत ज्यांची मला उत्तरं हवी आहे.सुजयराजे म्हणाले मी माखनला बोलावून घेतो,त्यावर राजेश्वरीने त्यांना सांगितले की माझ्या प्रश्नांची उत्तरं ह्याच राजमहालात सापडतील असे वाटते फक्त मला इथे माझ्या मनाप्रमाणे फिरण्याची मुभा द्यावी.सुजयराजे लगेच तयार झाले,फक्त तळघरात जाताना माखन किंवा केशर बरोबर असेल अशी काळजी घ्यायला सांगितले,राजेश्वरीच्या जीवाला धोका होऊ शकतो असे स्पष्टीकरण राजांनी दिले,थोड्याश्या अनिच्छेनी राजेश्वरीने होकार दिला.सुजयराजे अनिमिष नेत्रांनी राजेश्वरीकडे बघत होते.गडद अंधारात सुद्धा त्यांच्या नजरेनी राजेश्वरी अस्वस्थ झाली होती.ही भावना तिच्या करता सर्वस्वी नवीन होती,पण अजून तिला त्यात पुरतेपणी झोकून देता येत नव्हते कारण राणी सुकन्याचा चिरका,चिडका आवाज तिच्या कानात घुमत होता,"त्या सुजय राजाला चांगले पन्नास फटके मारा"का ? कश्याकरता पन्नास फटके मारायला निघाली होती ती ? हे गूढ उकलल्याशिवाय पुढचा विचार नको.
सौ.उषा.
उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ४...
उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ४...: श्री ४१ मुख्य चित्र राजेश्वरीने काढावे व भोवतीची सजावट रघुनाथने करावी असा सगळ्यांनी आग्रह धरल...
रविवार, २५ डिसेंबर, २०११
श्री ४१
मुख्य चित्र राजेश्वरीने काढावे व भोवतीची सजावट रघुनाथने करावी असा सगळ्यांनी आग्रह धरला कारण रघुनाथ बद्दल त्यांना खात्री होती पण राजेश्वरी उत्कृष्ट चित्र काढू शकते ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता.दोघही बापलेक चित्र कुठले काढावे यावर विचार करू लागले.एरवी रघुनाथ अस्वस्थ झाला नसता,पण आज त्याच्या लेकीची मनःस्थिती ठीक नव्हती अन सुजयराजांच्या मित्रांमध्ये काही जाणकार इंग्रज मित्र पण असल्याचे त्याला माखन कडून कळले होते.चित्र काढावेच लागणार होते फार विचार करूनहि उपयोग नव्हता.
राजेश्वरीने रघुनाथच्या पायावर डोके ठेऊन चित्र काढण्यास सुरवात केली.कुठले चित्र काढणार आहे हे तिने हळू आवाजात बापूला सांगितले.रघुनाथ झटपट कामाला लागला,कारण त्या चित्राची आरास त्यालाच करायची होती.भिंतीवर साकार होणाऱ्या चित्राची उत्सुकता शिगेला पोचली होती.दिवसभर तहान भूक हरपून दोघही बापलेक कामात दंग झाले ते एकाच वेळेस चित्र पूर्ण करून खाली बसले.राधाकृष्णाचे अप्रतिम चित्र साकार झाले होते.राजांचे इंग्रज मित्र जागचे उठून त्या दोघांजवळ आले अन त्यांचे अभिनंदन करू लागले.ते बघून इतरही मित्र मंडळी त्या दोघांजवळ येऊन पोचली.रघुनाथ अन राजेश्वरीवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.दोघही विनम्रपणे या वर्षावात नाहून निघत होते.सुजयराजांनी माखनला त्या दोघांकरता काही खायला आणायला सांगितले.सगळ्यानी राजेश्वरीचे खूप कौतुक केले,हे बघून सुजयराजे प्रसन्न झाले होते.एकाएकी ते आपल्या जागेवरून उठून राजेश्वरीजवळ आले,राजेश्वरीच्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडू लागले होते, त्यांनी राजेश्वरीकडे वळून एकदम विचारले "मी खूप दिवस एकटाच आहे,सुयोग्य जोडीदाराच्या शोधात मी होतो,आज मला असे वाटते आहे की तूच माझ्या जीवनाचे संगीत आहे,मी तुझ्याच शोधात होतो,तू जर मला होकार दिला तर या पृथ्वीवर मी सगळ्यात भाग्यवान व्यक्ती असेन.माझे जवळचे मित्र,आणी तुझे वडील यांच्या समक्ष मी तुला लग्नाची मागणी घालतो आहे.तुला पसंत नसेल तर तू नकार देऊ शकतेस.तुला स्वीकार असेल तर तू यातले लाल गुलाबाचे फूल या तूच काढलेल्या राधाकृष्णाच्या चित्रापुढे ठेव आणी नकार असेल तर पांढरे फूल ठेव.राजेश्वरीचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता.आपण ऐकले ते खरे की खोटे?राजे रजवाड्यांच्या गमती जमतीचा तर हा भाग नाही.एरवी धिटाईने सगळ्यांकडे बघणारी राजेश्वरी आत्ता मात्र मान वर करून पाहू शकत नव्हती.इतक्यात राजांचा एक मित्र अधीर स्वरात ओरडला,लाल की पांढरे फूल ? लवकर निर्णय द्या बा !रघुनाथची अवस्था तर फारच विलक्षण झाली होती.अजून राजेश्वरीने निर्णय घेतला नव्हता पण ती जणू आजच सासरी जायला निघाल्या प्रमाणे त्याला दुखः होत होते.एकीकडे लेकीची काळजी मिटली म्हणून आनंदही वाटत होता. राजेश्वरी फुलांच्या तबकाच्या दिशेनी निघाल्या बरोबर सगळ्या उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.सुजयराजांच्या हृदयाचे ठोके आता वाढले होते.राजेश्वरी तबकाजवळ अशी उभी होती की तिने कुठले फूल उचलले हे कोणालाच दिसले नाही,राधाकृष्णाच्या चित्रापुढे तिने ओंजळ रिकामी केली अन कुणालाही काही कळायच्या आत ती राजमहालातून धावत बाहेर पडली.
सौ.उषा.
मुख्य चित्र राजेश्वरीने काढावे व भोवतीची सजावट रघुनाथने करावी असा सगळ्यांनी आग्रह धरला कारण रघुनाथ बद्दल त्यांना खात्री होती पण राजेश्वरी उत्कृष्ट चित्र काढू शकते ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता.दोघही बापलेक चित्र कुठले काढावे यावर विचार करू लागले.एरवी रघुनाथ अस्वस्थ झाला नसता,पण आज त्याच्या लेकीची मनःस्थिती ठीक नव्हती अन सुजयराजांच्या मित्रांमध्ये काही जाणकार इंग्रज मित्र पण असल्याचे त्याला माखन कडून कळले होते.चित्र काढावेच लागणार होते फार विचार करूनहि उपयोग नव्हता.
राजेश्वरीने रघुनाथच्या पायावर डोके ठेऊन चित्र काढण्यास सुरवात केली.कुठले चित्र काढणार आहे हे तिने हळू आवाजात बापूला सांगितले.रघुनाथ झटपट कामाला लागला,कारण त्या चित्राची आरास त्यालाच करायची होती.भिंतीवर साकार होणाऱ्या चित्राची उत्सुकता शिगेला पोचली होती.दिवसभर तहान भूक हरपून दोघही बापलेक कामात दंग झाले ते एकाच वेळेस चित्र पूर्ण करून खाली बसले.राधाकृष्णाचे अप्रतिम चित्र साकार झाले होते.राजांचे इंग्रज मित्र जागचे उठून त्या दोघांजवळ आले अन त्यांचे अभिनंदन करू लागले.ते बघून इतरही मित्र मंडळी त्या दोघांजवळ येऊन पोचली.रघुनाथ अन राजेश्वरीवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.दोघही विनम्रपणे या वर्षावात नाहून निघत होते.सुजयराजांनी माखनला त्या दोघांकरता काही खायला आणायला सांगितले.सगळ्यानी राजेश्वरीचे खूप कौतुक केले,हे बघून सुजयराजे प्रसन्न झाले होते.एकाएकी ते आपल्या जागेवरून उठून राजेश्वरीजवळ आले,राजेश्वरीच्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडू लागले होते, त्यांनी राजेश्वरीकडे वळून एकदम विचारले "मी खूप दिवस एकटाच आहे,सुयोग्य जोडीदाराच्या शोधात मी होतो,आज मला असे वाटते आहे की तूच माझ्या जीवनाचे संगीत आहे,मी तुझ्याच शोधात होतो,तू जर मला होकार दिला तर या पृथ्वीवर मी सगळ्यात भाग्यवान व्यक्ती असेन.माझे जवळचे मित्र,आणी तुझे वडील यांच्या समक्ष मी तुला लग्नाची मागणी घालतो आहे.तुला पसंत नसेल तर तू नकार देऊ शकतेस.तुला स्वीकार असेल तर तू यातले लाल गुलाबाचे फूल या तूच काढलेल्या राधाकृष्णाच्या चित्रापुढे ठेव आणी नकार असेल तर पांढरे फूल ठेव.राजेश्वरीचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता.आपण ऐकले ते खरे की खोटे?राजे रजवाड्यांच्या गमती जमतीचा तर हा भाग नाही.एरवी धिटाईने सगळ्यांकडे बघणारी राजेश्वरी आत्ता मात्र मान वर करून पाहू शकत नव्हती.इतक्यात राजांचा एक मित्र अधीर स्वरात ओरडला,लाल की पांढरे फूल ? लवकर निर्णय द्या बा !रघुनाथची अवस्था तर फारच विलक्षण झाली होती.अजून राजेश्वरीने निर्णय घेतला नव्हता पण ती जणू आजच सासरी जायला निघाल्या प्रमाणे त्याला दुखः होत होते.एकीकडे लेकीची काळजी मिटली म्हणून आनंदही वाटत होता. राजेश्वरी फुलांच्या तबकाच्या दिशेनी निघाल्या बरोबर सगळ्या उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.सुजयराजांच्या हृदयाचे ठोके आता वाढले होते.राजेश्वरी तबकाजवळ अशी उभी होती की तिने कुठले फूल उचलले हे कोणालाच दिसले नाही,राधाकृष्णाच्या चित्रापुढे तिने ओंजळ रिकामी केली अन कुणालाही काही कळायच्या आत ती राजमहालातून धावत बाहेर पडली.
सौ.उषा.
usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य
usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री 40 राजेश्वरीला जाग आली तीच मुली सुजयराजांच्य...
किल्ल्याचे रहस्य
श्री 40
राजेश्वरीला जाग आली तीच मुली सुजयराजांच्या आवाजाने.सुजयराजे रघुनाथला सांगत होते उद्या सकाळी ९ वाजता राजमहालाच्या भिंतीवर दोघांनी चित्र काढायचे आहे.येताना नवे कपडे घालून या अशी आठवण सुजय राजांनी करून दिली,रघुनाथने मान डोलावून होकार दिला.
रात्री रघुनाथ जवळ जवळ जागाच होता,ही मुलगी पुन्हा नाहीशी झाली तर काय.रात्र संपून दिवस उजाडला दोघही बापलेक आंघोळ करून तयार होऊन बसले,सध्या त्यांनी त्यांचे रोजचेच कपडे घातले होते.अगदी जाताना नवे कपडे घालू असे ठरले.काहीतरी खाऊन घ्यावे म्हणून दोघं विचारात असतानाच एक स्त्री त्यांच्या खोलीकडे येताना दिसली.ती जवळ आल्यावर राजेश्वरीच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही ती केशर होती.राजेश्वरी एकदम उठून उभी राह्यली तू? इथे?केशर हसत हसत आत आली अन म्हणाली आता जास्त बोलायला वेळ नाही तुला व्यवस्थित तयार करून आणायला मला सांगितले आहे . हे बघ मी काही सामान पण आणले आहे.राजेश्वरी म्हणाली मी अंघोळ करून तयारच आहे फक्त कपडे बदलले की झाले.केशर यावर मस्त हसली,तिने राजेश्वरीला तिच्या पुढे बसण्यास सांगितले,थोड्या नाराजीने राजेश्वरी तयार झाली.अर्ध्या तासात केशरने तिच्या केसांना तेल लावून सुंदर केश रचना केली,अन तिला सुजयराजांनी दिलेले नवे कपडे घालायला सांगितले.कपडे घातल्यावर तिने राजेश्वरीला ओढत आरश्याच्या खोलीत नेऊन आरश्या समोर उभे केले.आरश्यातल्या राजेश्वरीला बघून राजेश्वरी थक्क झाली किती सुंदर दिसत होती ती!केसांना तेलाची तकाकी,त्यांची विलोभनीय रचना अन गुलाबी रंगाच्या कपड्यात खरोखरच तिचा कायापालट झाला होता.रघुनाथ पण आपल्या मुलीचे हे नवे रूप बघून स्तिमित झाला होता.केशरनी तिला हळूच आठवण करून दिली राजमहालात जायची वेळ झाली होती.तिचे वाक्य संपता संपता माखन बोलवायला आला.रघुनाथ पण आज नवे कपडे घालून तयार होता,त्यांचे रंगाचे साहित्य,माखन आणी दुसरे काही सेवक आणणार होते त्यामुळे रघुनाथ अन राजेश्वरी दोघही त्या राजमहालाकडे निघाले.
राजमहालाच्या प्रवेश द्वारावर उभ्या असलेल्या सेवकांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्या करता असलेल्या मंचावर त्यांना बसायला सांगितले.ठरलेल्या वेळेच्या थोड्या आधीच दोघही बापलेक हजर असलेले बघून सुजयराजे खूष झाले.राजेश्वरीचे मनमोहक रूप आज सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होते.सुजयराजे स्वतःला मोठ्या कष्टाने आवरत होते.तिच्याकडे बघण्याचा अनावर मोह मनाला होऊनही त्यानी स्वतःला संयमाने बांधून ठेवले होते.सुजयराजांची सगळी मित्र मंडळी जमल्यावर सुजयराजांनी राजेश्वरीची सगळ्यांना ओळख करून दिली. आधी थोडे खाऊन मग त्या दोघांनी चित्र काढावे असे ठरले.
रघुनाथ अन राजेश्वरी दोघही अतिशय संकोचले होते. ह्या आधी त्यांना इतके बरोबरीच्या नात्याने कुणीच वागवले नव्हते अन त्यांचीही तशी अपेक्षा नव्हती.सुजयराजांच्या व्यक्तिमत्वाने दोघही खूपच प्रभावित झाले होते.राजेश्वरीच्या इच्छेविरुद्ध सुजयराजांचे चित्र तिच्या मनःपटलावर कोरले गेले होते.ते पुसण्याचा निष्फळ प्रयत्न राजेश्वरीने चालवला होता,कारण ती कुठल्याच दृष्टीने त्यांच्या योग्य नव्हती,सगळ्यात मुख्य ते विवाहित होते,राणी सुकन्या जिवंत होती,हे राजेश्वरीने स्वतःच्या डोळ्याने पहिले होते.काय करावे ?या मनाला कसे समजवावे ?डोळ्यात जमा झालेले पाणी राजेश्वरीने हलकेच निपटून टाकले.एकदा हे चित्राचे काम झाले की आपण येथून निघून जाणार आहो मग सुजय राजे आपल्याला दिसणार नाही,त्यांच्याशी तसाही आपला काही संबध नाही असे स्वतःला बजावत राजेश्वरी चित्र काढण्याकरता सज्ज झाली.
सौ.उषा
राजेश्वरीला जाग आली तीच मुली सुजयराजांच्या आवाजाने.सुजयराजे रघुनाथला सांगत होते उद्या सकाळी ९ वाजता राजमहालाच्या भिंतीवर दोघांनी चित्र काढायचे आहे.येताना नवे कपडे घालून या अशी आठवण सुजय राजांनी करून दिली,रघुनाथने मान डोलावून होकार दिला.
रात्री रघुनाथ जवळ जवळ जागाच होता,ही मुलगी पुन्हा नाहीशी झाली तर काय.रात्र संपून दिवस उजाडला दोघही बापलेक आंघोळ करून तयार होऊन बसले,सध्या त्यांनी त्यांचे रोजचेच कपडे घातले होते.अगदी जाताना नवे कपडे घालू असे ठरले.काहीतरी खाऊन घ्यावे म्हणून दोघं विचारात असतानाच एक स्त्री त्यांच्या खोलीकडे येताना दिसली.ती जवळ आल्यावर राजेश्वरीच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही ती केशर होती.राजेश्वरी एकदम उठून उभी राह्यली तू? इथे?केशर हसत हसत आत आली अन म्हणाली आता जास्त बोलायला वेळ नाही तुला व्यवस्थित तयार करून आणायला मला सांगितले आहे . हे बघ मी काही सामान पण आणले आहे.राजेश्वरी म्हणाली मी अंघोळ करून तयारच आहे फक्त कपडे बदलले की झाले.केशर यावर मस्त हसली,तिने राजेश्वरीला तिच्या पुढे बसण्यास सांगितले,थोड्या नाराजीने राजेश्वरी तयार झाली.अर्ध्या तासात केशरने तिच्या केसांना तेल लावून सुंदर केश रचना केली,अन तिला सुजयराजांनी दिलेले नवे कपडे घालायला सांगितले.कपडे घातल्यावर तिने राजेश्वरीला ओढत आरश्याच्या खोलीत नेऊन आरश्या समोर उभे केले.आरश्यातल्या राजेश्वरीला बघून राजेश्वरी थक्क झाली किती सुंदर दिसत होती ती!केसांना तेलाची तकाकी,त्यांची विलोभनीय रचना अन गुलाबी रंगाच्या कपड्यात खरोखरच तिचा कायापालट झाला होता.रघुनाथ पण आपल्या मुलीचे हे नवे रूप बघून स्तिमित झाला होता.केशरनी तिला हळूच आठवण करून दिली राजमहालात जायची वेळ झाली होती.तिचे वाक्य संपता संपता माखन बोलवायला आला.रघुनाथ पण आज नवे कपडे घालून तयार होता,त्यांचे रंगाचे साहित्य,माखन आणी दुसरे काही सेवक आणणार होते त्यामुळे रघुनाथ अन राजेश्वरी दोघही त्या राजमहालाकडे निघाले.
राजमहालाच्या प्रवेश द्वारावर उभ्या असलेल्या सेवकांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्या करता असलेल्या मंचावर त्यांना बसायला सांगितले.ठरलेल्या वेळेच्या थोड्या आधीच दोघही बापलेक हजर असलेले बघून सुजयराजे खूष झाले.राजेश्वरीचे मनमोहक रूप आज सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होते.सुजयराजे स्वतःला मोठ्या कष्टाने आवरत होते.तिच्याकडे बघण्याचा अनावर मोह मनाला होऊनही त्यानी स्वतःला संयमाने बांधून ठेवले होते.सुजयराजांची सगळी मित्र मंडळी जमल्यावर सुजयराजांनी राजेश्वरीची सगळ्यांना ओळख करून दिली. आधी थोडे खाऊन मग त्या दोघांनी चित्र काढावे असे ठरले.
रघुनाथ अन राजेश्वरी दोघही अतिशय संकोचले होते. ह्या आधी त्यांना इतके बरोबरीच्या नात्याने कुणीच वागवले नव्हते अन त्यांचीही तशी अपेक्षा नव्हती.सुजयराजांच्या व्यक्तिमत्वाने दोघही खूपच प्रभावित झाले होते.राजेश्वरीच्या इच्छेविरुद्ध सुजयराजांचे चित्र तिच्या मनःपटलावर कोरले गेले होते.ते पुसण्याचा निष्फळ प्रयत्न राजेश्वरीने चालवला होता,कारण ती कुठल्याच दृष्टीने त्यांच्या योग्य नव्हती,सगळ्यात मुख्य ते विवाहित होते,राणी सुकन्या जिवंत होती,हे राजेश्वरीने स्वतःच्या डोळ्याने पहिले होते.काय करावे ?या मनाला कसे समजवावे ?डोळ्यात जमा झालेले पाणी राजेश्वरीने हलकेच निपटून टाकले.एकदा हे चित्राचे काम झाले की आपण येथून निघून जाणार आहो मग सुजय राजे आपल्याला दिसणार नाही,त्यांच्याशी तसाही आपला काही संबध नाही असे स्वतःला बजावत राजेश्वरी चित्र काढण्याकरता सज्ज झाली.
सौ.उषा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)