सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

किल्ल्याचे रहस्य

                                                  श्री                                  ५६
सुकन्याच्या तैनातीत राहणे तारे वर चालण्यासारखे कठीण आहे हे लवकरच राजेश्वरीच्या लक्षात आले.एकतर तिला या जीहुजूर करण्याची मुळीच सवय नव्हती पण कंटाळून चालणार नव्हते.तिला सुवर्णरेखेचेच कौतुक वाटत होते ती या सगळ्या नाटकात किती उत्साहाने सहभागी झाली होती.
                 दुसऱ्या दिवशी सुकन्याची लहर सांभाळत एकदाची तिला तयार केले अन राजेश्वरीने सुटकेचा श्वास सोडला.खरतर राजेश्वरीला वेशभूषा रंगभूषा केशभूषा यांचे केशर इतके काय अजिबातच ज्ञान नव्हते.केशरला घालवून आपण चूक केली असे क्षणभर तिच्या मनात आले पण आता मागे जाण्यात अर्थ नव्हता अन ते शक्य पण नव्हते.तिने सुकन्याला अदबीने विचारले की आपणास आता काय खायला आवडेल?तिने सांगितलेले पदार्थ ऐकून राजेश्वरी थक्क झाली.एकतर तिने मुळात ते पदार्थ कधी ऐकलेच नव्हते खाणं तर फार लांबची गोष्ट होती आता काय कराव तिला काही कळेना .इतक्यात छोटी सुवर्णरेखा धावत बाहेर गेली ती जरा वेळाने एका ताटात पुष्कळ पदार्थ घेऊन आली अन सुकन्याला म्हणाली यातले काय आवडेल ते खा त्या पदार्थांवर सुकन्या अगदी तुटून पडली.राजकन्येचे प्रसंगावधान बघून राजेश्वरीला तिचे खूप कौतुक वाटले.कसेही करून केशरला पुन्हा बोलावून घ्यायचे राजेश्वरीने मनाशी नक्की ठरवले.आता दरबाराची वेळ होत आली होती त्याच्या आधी तिला अन राजकन्येला तयार व्हायला हवे होते.
               चार दिवस झाले राजेश्वरीला सुकन्याची सेवा करता करता हे काम तिला मुळीच आवडत नव्हते आज तिने सुकन्याशी धीर करून बोलायचे ठरवले.दरबाराची वेळ होत आली की सुकन्या एकदम खुशीत असायची हीच वेळ साधून तिने सुकन्याला विचारले की महाराणी सुकन्याचे कोमल मन दरबारातल्या रोजच्या त्याच त्या कैद्यांना बघून अन त्यांना त्याच त्या शिक्षा देऊन अगदी कंटाळले असेल तरी मी थोडा बदल सुचवू का ?सुकन्याच्या कपाळाला आठी पडली पण तिला वाटले की न जाणो आपल्या पेक्षाही काही भयंकर शिक्षा ही सुचवणार असेल म्हणून तिने संमती दर्शक मान हलवली पण ती तिच्या चिरक्या आवाजात राजेश्वरीला ओरडून म्हणाली माझ्या कैदेतून मी त्यांना कधीच बाहेर काढणार नाही.राजेश्वरीला एकूणच सुकन्या हे व्यक्तिमत्व फारसं आवडल  नव्हतं पण आता काही उपाय नसल्याने तिने मान हलवली.
 राजेश्वरी एकदम काही सुचल्या प्रमाणे म्हणाली की महाराणी आपण त्या कैद्यांना रोज फटक्यांची शिक्षा देता अन नंतर ते सारा दिवस खाउन पिऊन मजेत घालवतात त्या पेक्षा त्यांच्याकडून दिवसभर आपल्या उपयोगाचे काही काम करून घेतले तर ते आपल्या जास्त फायद्याचे ठरेल अर्थात आपल्याला माझ्यापेक्षा जास्त कळते.सुकन्या थोडी चिडली होती पण रोज तीच शिक्षा अन तेच वातावरण याचा खरं म्हणजे तिला पण कंटाळा आला होता.तिने थोड्या कान्ताल्याने अन किंचित उत्सुकतेने विचारले की या तिघांना कुठल्याही कामाची सवय नाही.

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री ५५ दुपारी केशर घाई घाईने राजेश्वरीला एक कपड्यांचा ...

किल्ल्याचे रहस्य

                                    श्री                               ५५
             दुपारी केशर घाई घाईने राजेश्वरीला एक कपड्यांचा जोड देऊन गेली.हा साधा वेश आणी नेहेमीच्या पद्धतीचा,राजेश्वरीला मनापासून आनंद झाला,तिने झटकन त्यातला एक अंगावर चढवला सुद्धा.हल्ली राजेश्वरीला पण जरा आरश्यात डोकवून पाहावेसे वाटू लागले होते.  त्यामुळे अंगावरचा विटका अन फटका कपडा तिने लगेच टाकून दिला.  कपडा अगदी नवा नव्हता केशरनी तिच्या जवळचा एक जोड आणून दिला होता,पण राजेश्वरीच्या कपड्यांपेक्षा नक्कीच चांगला होता.
              कसातरी दिवस घालवून संध्याकाळी राजेश्वरी रघुनाथला घेऊन सौधाकडे गेली.अंधार पडेतो ते बापलेक सभोवतीचा परिसर न्याहाळत उभे होते.मागे कुणाची तरी चाहूल लागली म्हणून तिने सहज वळून पहिले सुजयराजे अन राजकन्या लगबगीने येत होते.त्यांनी हळू आवाजात विचारले आम्हाला उशीर झाला का?राजेश्वरीने नाही अशी मान हलवली,आता मात्र लवकर निघायला पाहिजे.
                 आज सुवर्णरेखा फारच खूष होती.तिला कुणीतरी कसल्यातरी कामात सामावून घेणार याचा तिला अतोनात आनंद झाला होता.इकडे राजेश्वरीला काळजी होती की जर सुकन्याने विचारले की तो दुर्मिळ फुलांचा हार कुठे आहे तर आपण काय उत्तर देणार तिने लगेच ही शंका सुजयराजांजवळ बोलून दाखवली त्यावर त्यांनी तिला काहीतरी कानात सांगितले ते तिला पटले.सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. त्या पायरी जवळच्याच मार्गाने खाली जायचे नक्की झाले होते.पायरी जवळ येऊन सुजयराजांनी तिथल्या फुलाच्या पाकळ्या फिरवायला सुरवात केली,पायरी बाजूला सरकल्या बरोबर आत लोंबणारा दोरखंड त्यानी धरला अन झटकन आत उतरले,इकडे रघुनाथने पायरी धरून ठेवली होती,हातातली काठी घट्ट धरून राजेश्वरी अन राजकन्या पाठोपाठ आत उतरल्या अन सगळ्यात शेवटी रघुनाथ.राजेश्वरीने रघुनाथचा हात धरला एक तर अंधार होता अन रघुनाथ आज पहिल्यांदाच इथे आला होता.त्या दोघा बापलेकीचे बघून राजकन्या पण कुठूनशी एक काठी घेऊन आली होती.ती अगदी राजेश्वरी प्रमाणे वागायचा प्रयत्न करत होती.अंधारात चालत शेवटी ते त्या दालना जवळ येऊन पोचले.रात्रीची वेळ असल्याने फारशी वर्दळ नव्हती.त्या तिघांना तेथेच थांबवून सुजयराजे तिथून निघून गेले.थोड्याच वेळात केशर तिथे आली,तिच्याशी बोलून राजेश्वरीने झटकन निर्णय घेतला  आता राजेश्वरीने अन छोट्या राजकन्येने केशरचा हात घट्ट धरून तिला ओढत सुकन्याच्या दालनात आणले,तिच्या अपेक्षेप्रमाणे सुकन्या तिच्यावर जोरात ओरडली तू दोन तीन दिवस कुठे होतीस? काम करायला नको तुम्हाला ?चांगले फटके मारायला हवे,तिचे सगळे बोलणे झाल्यावर राजेश्वरी नम्र स्वरात म्हणाली महाराणी सुकन्या आपण रागावला ते अगदी बरोबर आहे फक्त माझ्या ऐवजी या केशरला रागवावे,आपणा करता केलेला हार हिने चक्क सुजय राजांना देऊन टाकला आणी ही आम्हाला इथे आपल्या समोर येऊ देत नव्हती,आत्ता आम्ही बळजबरीने आत आलो आहो,हे ऐकल्यावर सुकन्याचा अवतार पाहण्यासारखा होता.ती केशरला खूप रागावली अन ताबडतोब तिला हा महाल सोडून जायला सांगितले.तिने राजेश्वरीची आपल्या सेवे करता निवड केली.राजेश्वरीला अगदी हवे तसेच सगळे घडले होते.तिने सुकन्याला वाकून नमस्कार केला,तिचे बघून सुवर्णरेखेने पण तसाच नमस्कार केला.आता डाव पूर्णपणे राजेश्वरीच्या हातात होता,म्हणजे निदान तिला तरी असे वाटत होते.
                                                सौ.उषा.  

रविवार, २९ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री ५४ किल्ला...

किल्ल्याचे रहस्य

                                              श्री                                                    ५४
                        किल्ला दुरून दिसू लागला होता.आपले घर दिसल्या सारखा आनंद सगळ्यांना झाला.राजेश्वरी खोलीत आली आणी ती आश्चर्य चकित झाली एकाच दिवसात खोलीचा कायापालट झाला होता.खोलीत दोन पलंग त्यावर गाद्या सुंदर चादरी अन खोलीत पाय रुतेल इतका जाड गालीचा. रघुनाथ पण या बदलाने प्रभावित झाल्याशिवाय राह्यला नाही. त्याला फक्त एकाच काळजीने व्यापले होते की आपण आता झोपायचे कसे? इतक्या जाड गादीवर आजवर तो कधीच झोपला नव्हता. सुवर्णरेखेला मात्र या सगळ्यापेक्षा आपल्याला इथे राह्यला मिळणार अन जमलं तर त्या बाईला पुन्हा भेटायला मिळणार.माझ्या म्हाताऱ्या आजी आजोबांना,माझ्या बापूला फटके मारणाऱ्या, उपाशी ठेवणाऱ्या त्या बाईला काहीतरी जबरदस्त शिक्षा केली पाहिजे या विचारात ती दंग होती.राजेश्वरी फुलांच्या पायघड्यांवर जणू चालत होती.एकाच वेळेस सर्व रंग अवतरले होते .त्या रंगांचे कौतुक राजेश्वरी शिवाय कोण जाणू शकणार!
तिचा जन्मच मुळी रंगांशी खेळण्या करता झाला होता.
                      किल्ल्यावरची सगळी माणसं काहीतरी निमित्त साधून खोलीत डोकावून गेली होती.राजेश्वरी अन रघुनाथचे एका दिवसात पालटलेले भाग्य सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय होते.त्यात राजकन्येला त्यांच्या बरोबर राह्यची परवानगी हा तर रहस्यमय भाग होता.राजेश्वरीला मनातल्या मनात हसू येत होते.आपल्या अंगावर धड कपडे नाही अन या उंची गालिचे अन चादरीवर आपण वावरायचे छे!ही बहुदा राजकन्ये करता व्यवस्था केली असावी.आपणच रात्री दुसरी खोली गाठावी हेच बरे.तिची विचार शृंखला तुटली ती माखनच्या आवाजाने त्याने हातातले गाठोडे तिच्या स्वाधीन केले अन सांगितले की महाराणी म्हणाल्या की यापुढे हेच कपडे अन अलंकार घालायचे.त्याचे वाक्य जणु पूर्ण करण्या करता आत येत सुजयराजे म्हणाले तसेही तुझे वस्त्र वाघाशी लढताना फाटले,जळले आहे,तेव्हा आता नाही म्हणू नकोस आणी या सगळ्याचा स्वीकार कर. राजेश्वरी फक्त एवढेच म्हणाली की मला जर त्या ठिकाणी नोकर म्हणून जायचे असेल तर मला एवढे भारी कपडे अन अलंकार घालणे सोयीचे नाही.आपण या आधी दिलेले हे थोडे अलंकार मी रोज घालते,मला कपड्यांची आवश्यकता आहे पण ते साधे कपडे,त्यांची कृपया व्यवस्था करावी.आणी हो आपल्याला कसे कळले मी वाघाला पळवले,सुजयराजे हसत म्हणाले,आम्ही तुमच्या मागोमाग इकडे यायला निघालो.आम्ही संध्याकाळी येणार होतो पण मग विचार आला की तुझ्या शोध मोहिमेत मला पण भाग घ्यायला मिळाला तर तेवढाच आनंद मिळेल.
                                   राजेश्वरीच्या योजनेप्रमाणे रात्री सगळ्यांनी वागायचे नक्की झाले.रघुनाथ,सुजयराजे बरोबर येणार म्हणून एकीकडे तिला आनंद झाला होता अन त्याच वेळेस त्यांचे येणे त्यात सुवर्णरेखा बरोबर म्हणजे थोडी काळजी वाटत होती.याच योजनेचा भाग म्हणून सुजयराजे राजकन्येला घेऊन राजमहालात गेले.
                                सौ.उषा.
                       
                    




                                                                             

बुधवार, २५ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com:                                          श्री     ...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ...: श्री ५३ राजेश्वरी राजवाड्यातून बाहेर जायला निघाल्यावर महारा...
                                         श्री                                    ५३
राजेश्वरी राजवाड्यातून बाहेर जायला निघाल्यावर महाराज स्वतःच म्हणाले पायी जाऊ नका तुम्ही आमच्या सुजयराजांची वधू आहात सुजयराजे बाहेर त्यांच्या बरोबर आले आणी त्यांनी हळू आवाजात त्या दोघांना जास्त सावध राहण्याची सूचना केली.आणी आज संध्याकाळी आपण येईपर्यंत खोलीतून कुठेही न जाण्याची त्यांनी अप्रत्यक्ष सूचनाच केली.त्यांचे बोलणे सुरु होते तोच कुठूनतरी सुवर्णरेखा धावत आली आणी राजेश्वरी बरोबर जाण्याचा हट्ट करू लागली.शेवटी सुजयराजे तिला म्हणाले की आजी आजोबा हो म्हणाले तरच जायचं,राजकन्या पटकन आत धावत गेली अन येताना महाराज सुदर्शन अन महाराणी सुलक्षणाला बरोबर घेऊन आली त्यानी राजेश्वरीला राजकन्येची काळजी घ्यायला बजावून सांगितले.तिचा सेवक पण थोड्यावेळात तिच्याकरता खाण्याचे साहित्य अन काही कपडे घेऊन हजर झाला.रात्री उशीरा राजवाड्यावर परत यायचे नाही असे त्यानी सांगितल्यामुळेतर राजकन्येला फारच आनंद झाला.म्हणजे आज रात्री पण आपल्याला किल्य्यावर राह्यला मिळेल,राजेश्वरी बरोबर राह्यला मिळेल.सेवक घोड्यावर अन बाकी तिघं बैलगाडीतून निघाले.राजेश्वरीच मन पिसा सारखं हलकं झालं होतं.तिच्या बुद्धी आणी मनाचा मोठा अजब खेळ चालला होतं.बुद्धी सर्व तपासून घ्यायला सांगत होती,अन मन म्हणत होतं मला कुठल्याच प्रश्नांची उत्तर नको.मला सुजय राजांनी आपलं म्हंटल हेच माझ्या करता पुरेसे आहे.हातातल्या काठीशी एकीकडे तिचा खेळ सुरु होता.राजेश्वरी भानावर आली ती समोरच्या दृश्याने 
राजकन्या तर भीतीने थरथर कापू लागली.समोर मोठ्या डौलात बसलेल्या वाघोबांना बघून सगळेच घाबरले होते,बैल आधीच बुजले होते पण आपल्याच तालात असलेल्या राजेश्वरीच्या ते लक्षात आले नव्हते. रघुनाथ खाली उतरला अन म्हणाला तुम्ही माघारी जा मी एकटा या वाघाला थोपवून धरतो .राजेश्वरीने सपशेल नकार दिला,तिने पटकन अंगावरची ओढणी काढली गाडीवाना जवळून त्याची काड्यापेटी घेतली अन ओढणी पेटवून दिली,एका हातात पेटलेली ओढणी अन दुसऱ्या हातात काठी घेऊन ती सरळ वाघावर चालून गेली.वाघ जागचा उठून जंगलात पळाला.राजेश्वरीचे प्रसंगावधान बघून सगळेच आश्चर्यचकित झाले. उरलेलेला प्रवास निर्विघ्न पार पडला.साऱ्या रस्ताभर सुवर्णरेखा राजेश्वरीला  बिलगून बसली.राजेश्वरी अन रघुनाथ हाच विचार करत होते की आजवर जंगलात इतक्या वेळा जाऊन कधीही वाघ दिसला नाही. संकट थोडक्यात टळले होते.
                                सौ.उषा.