मंगळवार, २० डिसेंबर, २०११
usha-ushagmailcom.blogspot.com: For Site Visitors - Inviting friends to join a sit...
usha-ushagmailcom.blogspot.com: For Site Visitors - Inviting friends to join a sit...: For Site Visitors - Inviting friends to join a site you belong to
किल्ल्याचे रहस्य
श्री ३५
केशरनी राजेश्वरीला तिच्या मागे यायला सांगितले.त्या दोघी तिथून भरभर चालत निघाल्या.एका कपाटा जवळ येऊन केशर थांबली,तिने कपाटाचे दार उघडले,त्यातले दोन लाकडी खण खाली काढून ठेवले अन मग राजेश्वरीला तिथून दिसत असलेल्या भुयारात जायला सांगितले,राजेश्वरी चुपचाप भुयारात उतरली,,तिच्या पाठीवर खाडकन दार आपटल्याचा आवाज आला.मागे आणी पुढे गुडूप अंधार स्वतःच्या संरक्षणाचे कुठलेही साधन नाही अश्या अवस्थेत राजेश्वरी पुढे जात होती.डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या पण रहस्याचा उलगडा झाल्याशिवाय चैन पडत नाही असा स्वभाव !कितीतरी वेळ ती चालत होती भुयार संपतच नव्हते,तहान आणी भूक या दोन्ही शरीराच्या गरजा आता उग्र झाल्या होत्या पण तिकडे लक्ष द्यायला राजेश्वरीला वेळ नव्हता.इथून बाहेर पडणे हे पहिले लक्ष्य होते.
इकडे रघुनाथची वेगळीच पंचाईत झाली होती.रात्री त्याने खूप प्रयत्न करून पण ती पायरी जागची तसूभर सुद्धा सरकली नव्हती,शेवटी पहाटे कंटाळून तो आपल्या खोलीवर परत आला.आता त्याला वेगळीच चिंता भेडसावू लागली,उजाडल्यावर काही वेळाने राजमहालात जावे लागणार, राजेश्वरीच्या न येण्याचे कुठले कारण आपण सांगणार आहोत?रघुनाथला एकाच वेळेस राजेश्वरीचा राग आणी काळजी दोन्ही वाटत होती.या मुलीचे एकदा लग्न लावून दिले म्हणजे आपली या काळजीतून सुटका होईल,पण लग्न करणार कोण आपल्या ह्या विचित्र मुलीशी?अश्या कितीतरी विचारांनी रघुनाथ बिचारा हैराण झाला.नाही म्हटले तरी त्याचेही आता वय झाले होते,अन वयापेक्षाही गरीबी,भटकंती,अन काळजीने तो जास्त थकला होता.
आंघोळीला जायच्या आधी रघुनाथने गाद्या अन उशांची रचना अशी काही केली की बघणाऱ्याला वाटावे कुणी पांघरूण घेऊन झोपले आहे.वाटेत त्याला माखन भेटला,स्वतःच्या स्वभावाच्या विरुद्ध रघुनाथने त्याला आजच्या मेजवानीची तयारी कशीकाय चालली आहे अशी चौकशी केली,बोलता बोलता रघुनाथने माखनला हेही सांगितले की राजेश्वरीला चांगलाच ताप भरला आहे अन ती अगदी झोपून आहे आजच्या कार्यक्रमाला ती कितपत येऊ शकेल ह्याची शंकाच वाटते हे सांगायला पण रघुनाथ विसरला नाही .
सौ.उषा.
केशरनी राजेश्वरीला तिच्या मागे यायला सांगितले.त्या दोघी तिथून भरभर चालत निघाल्या.एका कपाटा जवळ येऊन केशर थांबली,तिने कपाटाचे दार उघडले,त्यातले दोन लाकडी खण खाली काढून ठेवले अन मग राजेश्वरीला तिथून दिसत असलेल्या भुयारात जायला सांगितले,राजेश्वरी चुपचाप भुयारात उतरली,,तिच्या पाठीवर खाडकन दार आपटल्याचा आवाज आला.मागे आणी पुढे गुडूप अंधार स्वतःच्या संरक्षणाचे कुठलेही साधन नाही अश्या अवस्थेत राजेश्वरी पुढे जात होती.डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या पण रहस्याचा उलगडा झाल्याशिवाय चैन पडत नाही असा स्वभाव !कितीतरी वेळ ती चालत होती भुयार संपतच नव्हते,तहान आणी भूक या दोन्ही शरीराच्या गरजा आता उग्र झाल्या होत्या पण तिकडे लक्ष द्यायला राजेश्वरीला वेळ नव्हता.इथून बाहेर पडणे हे पहिले लक्ष्य होते.
इकडे रघुनाथची वेगळीच पंचाईत झाली होती.रात्री त्याने खूप प्रयत्न करून पण ती पायरी जागची तसूभर सुद्धा सरकली नव्हती,शेवटी पहाटे कंटाळून तो आपल्या खोलीवर परत आला.आता त्याला वेगळीच चिंता भेडसावू लागली,उजाडल्यावर काही वेळाने राजमहालात जावे लागणार, राजेश्वरीच्या न येण्याचे कुठले कारण आपण सांगणार आहोत?रघुनाथला एकाच वेळेस राजेश्वरीचा राग आणी काळजी दोन्ही वाटत होती.या मुलीचे एकदा लग्न लावून दिले म्हणजे आपली या काळजीतून सुटका होईल,पण लग्न करणार कोण आपल्या ह्या विचित्र मुलीशी?अश्या कितीतरी विचारांनी रघुनाथ बिचारा हैराण झाला.नाही म्हटले तरी त्याचेही आता वय झाले होते,अन वयापेक्षाही गरीबी,भटकंती,अन काळजीने तो जास्त थकला होता.
आंघोळीला जायच्या आधी रघुनाथने गाद्या अन उशांची रचना अशी काही केली की बघणाऱ्याला वाटावे कुणी पांघरूण घेऊन झोपले आहे.वाटेत त्याला माखन भेटला,स्वतःच्या स्वभावाच्या विरुद्ध रघुनाथने त्याला आजच्या मेजवानीची तयारी कशीकाय चालली आहे अशी चौकशी केली,बोलता बोलता रघुनाथने माखनला हेही सांगितले की राजेश्वरीला चांगलाच ताप भरला आहे अन ती अगदी झोपून आहे आजच्या कार्यक्रमाला ती कितपत येऊ शकेल ह्याची शंकाच वाटते हे सांगायला पण रघुनाथ विसरला नाही .
सौ.उषा.
सोमवार, १९ डिसेंबर, २०११
शनिवार, १७ डिसेंबर, २०११
किल्ल्याचे रहस्य
श्री ३४
माखन आज अशीकशी चूक झाली ? ती जिन्यातली झडप बंद केली नव्हती का?सुजयराजे त्यांच्या नेहेमीच्याच मृदू स्वरात विचारत होते.त्यांच्या प्रश्नावर माखन एव्हढेच म्हणाला राजे मी तुमच्या मित्रांच्या तैनातीत असताना नेमकी केशर तिथून गेली अन तुमचे मित्र तिच्या पाठलागावर निघालेले बघून मीच त्यांना दुसऱ्या वाटेवर घेऊन गेलो केशर नेहेमीच्या मार्गावरून सुखरूप गेलेली बघितल्यावर रात्री उशीरा मी ती झडप आतल्या बाजूने बंद करून टाकली,केशरला जरा दरडावून विचारल्यावर ती म्हणाली की महाराणी सुकन्याच्या आज्ञेप्रमाणे मला वागणे भाग होते,नाहीतर तिला फटके खावे लागले असते.बर जे झालं ते झालं आता दोन तीन दिवस केशरला बाहेर फिरकू देऊ नका,झालच तर राणी सुकन्या जास्त काळ झोपेत घालवतील ह्याची काळजी घ्यायला सांग केशरला.एव्हढं बोलून सुजयराजे झपाट्याने तिथून निघून गेले.त्यांच्या पाठोपाठ तिथली सगळी माणसं काहीच घडलं नाही अश्याप्रकारे निघून गेली. राजेश्वरीच्या डोक्यात अनेक विचारांनी थैमान घातले होते.जिला आपण मृत समजलो ती सुकन्या चक्क जिवंत आहे अन सुजयराजांना,माखनला हे गुपित माहीत असूनही सुंदरपुरात कुणाला माहिती नाही हे आणखी एक नवल!ती सुकन्या सगळ्यांना फटक्याची शिक्षा देऊन खूष होत होती अन सुजयराजांना सगळे माहीत असून त्यांना त्याबद्दल काहीच बोलायचे नव्हते.सगळीकडे नीरव शांतता पसरली होती,राजेश्वरी हलकेच कानोसा घेऊन उभी राह्यली आसपास कुणीही नाही बघितल्यावर ती उठून उभी राह्यली.एका जागी खूप वेळ बसल्याने सगळे अंग आखडून गेले होते,पण इथे फार काळ थांबणे धोकादायक होते,कसेही करून इथून सुटका करून घ्यायला हवी,राजेश्वरी विचारांच्या गुंत्यात पार गुरफटली होती,इतक्यात तिला काही बायकी आवाज आले,अरे ही तर तीच स्त्री आहे रात्री गाणे म्हणत फिरणारी ,काय कराव ? पुढे जाव का?ह्या स्त्रीची मदत मागावी का?निर्णय लवकर घ्यायला हवा.शेवटी धाडस करून राजेश्वरी एकदम पुढे झाली तिला बघून त्या स्त्रिया एकदम दचकल्या, त्या ओरडायच्या आत ती स्त्री, केशर म्हणाली मीच आणलं आहे तिला राजेश्वरी तिचे नाव!राजेश्वरी डोळे विस्फारून तिच्याकडे बघतच राह्यली.
सौ.उषा.
माखन आज अशीकशी चूक झाली ? ती जिन्यातली झडप बंद केली नव्हती का?सुजयराजे त्यांच्या नेहेमीच्याच मृदू स्वरात विचारत होते.त्यांच्या प्रश्नावर माखन एव्हढेच म्हणाला राजे मी तुमच्या मित्रांच्या तैनातीत असताना नेमकी केशर तिथून गेली अन तुमचे मित्र तिच्या पाठलागावर निघालेले बघून मीच त्यांना दुसऱ्या वाटेवर घेऊन गेलो केशर नेहेमीच्या मार्गावरून सुखरूप गेलेली बघितल्यावर रात्री उशीरा मी ती झडप आतल्या बाजूने बंद करून टाकली,केशरला जरा दरडावून विचारल्यावर ती म्हणाली की महाराणी सुकन्याच्या आज्ञेप्रमाणे मला वागणे भाग होते,नाहीतर तिला फटके खावे लागले असते.बर जे झालं ते झालं आता दोन तीन दिवस केशरला बाहेर फिरकू देऊ नका,झालच तर राणी सुकन्या जास्त काळ झोपेत घालवतील ह्याची काळजी घ्यायला सांग केशरला.एव्हढं बोलून सुजयराजे झपाट्याने तिथून निघून गेले.त्यांच्या पाठोपाठ तिथली सगळी माणसं काहीच घडलं नाही अश्याप्रकारे निघून गेली. राजेश्वरीच्या डोक्यात अनेक विचारांनी थैमान घातले होते.जिला आपण मृत समजलो ती सुकन्या चक्क जिवंत आहे अन सुजयराजांना,माखनला हे गुपित माहीत असूनही सुंदरपुरात कुणाला माहिती नाही हे आणखी एक नवल!ती सुकन्या सगळ्यांना फटक्याची शिक्षा देऊन खूष होत होती अन सुजयराजांना सगळे माहीत असून त्यांना त्याबद्दल काहीच बोलायचे नव्हते.सगळीकडे नीरव शांतता पसरली होती,राजेश्वरी हलकेच कानोसा घेऊन उभी राह्यली आसपास कुणीही नाही बघितल्यावर ती उठून उभी राह्यली.एका जागी खूप वेळ बसल्याने सगळे अंग आखडून गेले होते,पण इथे फार काळ थांबणे धोकादायक होते,कसेही करून इथून सुटका करून घ्यायला हवी,राजेश्वरी विचारांच्या गुंत्यात पार गुरफटली होती,इतक्यात तिला काही बायकी आवाज आले,अरे ही तर तीच स्त्री आहे रात्री गाणे म्हणत फिरणारी ,काय कराव ? पुढे जाव का?ह्या स्त्रीची मदत मागावी का?निर्णय लवकर घ्यायला हवा.शेवटी धाडस करून राजेश्वरी एकदम पुढे झाली तिला बघून त्या स्त्रिया एकदम दचकल्या, त्या ओरडायच्या आत ती स्त्री, केशर म्हणाली मीच आणलं आहे तिला राजेश्वरी तिचे नाव!राजेश्वरी डोळे विस्फारून तिच्याकडे बघतच राह्यली.
सौ.उषा.
रविवार, ११ डिसेंबर, २०११
किल्ल्याचे रहस्य
श्री ३३
राजेश्वरी जीव मुठीत धरून समोरचा दरबार बघत होती.ती ज्या आसनाच्या मागे लपली होती तिथे एक स्त्री येऊन बसल्याचे तिला एव्हाना कळले होते.सुजयराजांच्या किल्ल्यात त्यांच्याशिवाय आणखीही कुणी राहतंय हे त्यांना तरी माहित आहे की नाही कोण जाणे. स्वतःशीच विचार करत बसलेली राजेश्वरी एका त्रासदायक चिरक्या अन चिडक्या आवाजाने पुन्हा भानावर आली.कुणी तरी जोरात ओरडून विचारत होते अजून दरबाराचे काम सुरु का झाले नाही?दबक्या विनवणीच्या सुरात कुणीतरी उत्तर दिले आज आरोपींना आणायला उशीर झाला म्हणून महाराणीनी रागवू नये.त्याचे वाक्य संपता संपता दोघा तिघांना फरपटत आणले गेले.आणलेली माणसे खाली मान घालून उभी होती.ती स्त्री जिला महाराणी म्हटले होते ती एकदम उत्तेजित झाल्यासारखी ओरडली सुदर्शन अन सुलक्षणा दोघांना आमच्या समोर पंचवीस फटके मारा अन दिवसभर उपाशी ठेवा,राजेश्वरी दचकून समोर बघू लागली,पण हे काही महाराज सुदर्शन अन महाराणी सुलक्षणा नाहीत.अन दर फटक्यानिशी ते कळवळून ओरडत होते,विनवणी करत होते,ती स्त्री मात्र फारच आनंदित होत होती.हा सगळा विलक्षण प्रकार काय आहे ह्या विचारात असलेल्या राजेश्वरीच्या कानावर पुढचे वाक्य पडले त्या सुजयराजाला आमच्या समोर हजर करा अन त्याला चांगले पन्नास फटके मारा,अन हो त्याच्या मुलीला सोडू नका बरका ती पण विषवल्लीच आहे.तिला पण झोडपून काढा.एव्हढे ऐकल्यावर राजेश्वरी भान हरपून एकदम उभीच राहणार होती पण मोठ्या कष्टाने तिने स्वतःला आवरले.फटक्यांची शिक्षा झालेली माणसं तिथेच खाली बसली होती.राजेश्वरीला त्यांची खूप दया आली,अन त्या स्त्रीचा भयंकर संताप राग आला.हे काय गौडबंगाल आहे हे काही केल्या कळत नव्हते.तिने कानोसा घेतला ती महाराणी म्हणवणारी स्त्री उठून गेली होती पण समोर अजूनही ती फटके खाल्लेली माणसं बसली होती ,जरा वेळाने तिला पुन्हा गडबड ऐकू आली,राजेश्वरीने बघण्याचा निष्फळ प्रयत्न केला,इथून केव्हा बाहेर पडता येईल याचा काहीच अंदाज येत नव्हता,तिला आता बापूच्या काळजीने घेरले,तो पण आत आला तर छे आपण इथून तडक बाहेर पडले पाहिजे पण कसे ?एका ओळखीच्या आवाजाने राजेश्वरी विचारचक्रातून बाहेर पडली,होय हा नक्कीच सुजयराजांचा आवाज आहे.
सौ.उषा.
राजेश्वरी जीव मुठीत धरून समोरचा दरबार बघत होती.ती ज्या आसनाच्या मागे लपली होती तिथे एक स्त्री येऊन बसल्याचे तिला एव्हाना कळले होते.सुजयराजांच्या किल्ल्यात त्यांच्याशिवाय आणखीही कुणी राहतंय हे त्यांना तरी माहित आहे की नाही कोण जाणे. स्वतःशीच विचार करत बसलेली राजेश्वरी एका त्रासदायक चिरक्या अन चिडक्या आवाजाने पुन्हा भानावर आली.कुणी तरी जोरात ओरडून विचारत होते अजून दरबाराचे काम सुरु का झाले नाही?दबक्या विनवणीच्या सुरात कुणीतरी उत्तर दिले आज आरोपींना आणायला उशीर झाला म्हणून महाराणीनी रागवू नये.त्याचे वाक्य संपता संपता दोघा तिघांना फरपटत आणले गेले.आणलेली माणसे खाली मान घालून उभी होती.ती स्त्री जिला महाराणी म्हटले होते ती एकदम उत्तेजित झाल्यासारखी ओरडली सुदर्शन अन सुलक्षणा दोघांना आमच्या समोर पंचवीस फटके मारा अन दिवसभर उपाशी ठेवा,राजेश्वरी दचकून समोर बघू लागली,पण हे काही महाराज सुदर्शन अन महाराणी सुलक्षणा नाहीत.अन दर फटक्यानिशी ते कळवळून ओरडत होते,विनवणी करत होते,ती स्त्री मात्र फारच आनंदित होत होती.हा सगळा विलक्षण प्रकार काय आहे ह्या विचारात असलेल्या राजेश्वरीच्या कानावर पुढचे वाक्य पडले त्या सुजयराजाला आमच्या समोर हजर करा अन त्याला चांगले पन्नास फटके मारा,अन हो त्याच्या मुलीला सोडू नका बरका ती पण विषवल्लीच आहे.तिला पण झोडपून काढा.एव्हढे ऐकल्यावर राजेश्वरी भान हरपून एकदम उभीच राहणार होती पण मोठ्या कष्टाने तिने स्वतःला आवरले.फटक्यांची शिक्षा झालेली माणसं तिथेच खाली बसली होती.राजेश्वरीला त्यांची खूप दया आली,अन त्या स्त्रीचा भयंकर संताप राग आला.हे काय गौडबंगाल आहे हे काही केल्या कळत नव्हते.तिने कानोसा घेतला ती महाराणी म्हणवणारी स्त्री उठून गेली होती पण समोर अजूनही ती फटके खाल्लेली माणसं बसली होती ,जरा वेळाने तिला पुन्हा गडबड ऐकू आली,राजेश्वरीने बघण्याचा निष्फळ प्रयत्न केला,इथून केव्हा बाहेर पडता येईल याचा काहीच अंदाज येत नव्हता,तिला आता बापूच्या काळजीने घेरले,तो पण आत आला तर छे आपण इथून तडक बाहेर पडले पाहिजे पण कसे ?एका ओळखीच्या आवाजाने राजेश्वरी विचारचक्रातून बाहेर पडली,होय हा नक्कीच सुजयराजांचा आवाज आहे.
सौ.उषा.
किल्ल्याचे रहस्य ...
usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ३२ राजेश्वरी अन रघुनाथ रात्री उशीर...
शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११
श्री ३२
राजेश्वरी अन रघुनाथ रात्री उशीरा पर्यंत उद्या काढायच्या चित्राची चर्चा करत होते.उपलब्ध रंग पुरेसे होते पण चित्राबद्दल एकमत काहीकेल्या होत नव्हते.शेवटी वेळेवर ठरवू म्हणून दोघही झोपायच्या तयारीत असताना त्यांना तीच स्त्री पुन्हा दिसली.राजेश्वरीने रघुनाथकडे बघितले अन दुसऱ्याच क्षणी ती हातात काठी घेऊन त्या स्त्रीचा पाठलाग करू लागली.यावेळी राजेश्वरी पुरती सावध होती त्यामुळे ती इकडे तिकडे बघत तिचा अचूक पाठलाग करत होती.तिच्या अपेक्षेप्रमाणे ती स्त्री सौधाच्या दिशेने जाऊ लागली.पायऱ्या चढता चढता अचानक दिसेनाशी झाली पण आज राजेश्वरीला नवल वाटले नाही,तिच्या नाहीसे होण्याची जागा अन युक्ती दोन्ही आता माहित झाले होते.राजेश्वरीने पण पायरीवर पाय ठेवला,पुढे जाणार तोच कुणीतरी हात धरला,राजेश्वरीने वळून बघितले,तिला आश्चर्य वाटले रघुनाथ तिच्या पाठोपाठ आला होता.राजेश्वरीने प्रश्नार्थक दृष्टीने त्याच्याकडे पाह्यले.रघुनाथ म्हणाला एकटी जाऊ नको मी पण येतो त्यावर राजेश्वरीने त्याला त्या दिवशी घडलेला प्रसंग थोडक्यात सांगितला आणी त्याला बाहेर थांबायला सांगितले जर उशीर झाला तरच रघुनाथने आत यायचे असे ठरले,रघुनाथने बरोबर एक जाड दोरी आणली होती,ती कमरेला बांधून राजेश्वरी पहिली पायरी चढली त्या कमळाला हात पोचतो का ते बघितले मग पुढच्या तीन पायऱ्या चढून ती कमळाची पाचवी पाकळी फिरवू लागली पायरी सरकली पण या वेळी राजेश्वरी सावध असल्यामुळे ती तोल जाऊन पडली नाही,पुढच्या अंधारात तिने हातातली काठी फिरवली,काहीतरी हलल्यासारखे दिसले,आता तिने पुन्हा काठी फिरवून ती हलणारी वस्तू हातात पकडण्याचा प्रयत्न चालवला,शेवटी एकदाची ती हलणारी वस्तू पकडण्यात तिला पूर्ण यश प्राप्त झाले.तो एक जाडसर दोरखंड होता जो तिथे मुद्दामच लटकत ठेवला होता हे उघड होते.दोरखंडाला धरून राजेश्वरी सुखरूप आत उतरली,पण इकडे बाहेर थोडा गोंधळ झाला होता.राजांच्या मित्रांपैकी कुणीतरी त्या स्त्रीला सौधाकडे येताना बघितले होते त्याने बाकीच्या मित्रांना उठवून इकडेच आणले होते.रघुनाथ पटकन एका दाट झाडाच्या मागे लपला.थोड्यावेळ शोधाशोध करून शेवटी सगळे झोपायला निघून गेले.राजेश्वरीची वाट बघत तिथेच थांबावे की पुन्हा खोलीत जाऊन झोपावे या संभ्रमात रघुनाथ बसल्याजागीच डुलकी घेऊ लागला.राजेश्वरी हातातली काठी सांभाळत हळूहळू पुढे जाऊ लागली.त्य दिवशी सारखीच प्रकाशाची तिरीप दिसू लागल्यावर आणखी सावधगिरीने पुढे पुढे जात असता आपण एका महालात येऊन पोचल्याचे कळल्याने ती थोडी घाबरल्या सारखी झाली.अचानक तिला काही माणस या दिशेनी येताना दिली दिसली.इकडे तिकडे बघून तिने एका सिव्हासनाच्या मागे लपणे पसंत केले.थोड्याच वेळात तो महाल पूर्ण भरून गेला.राजेश्वरी लपली होती त्या जागेवर कुणीतरी येऊन बसले अन दरबाराचे काम सुरु झाले.
सौ.उषा.
राजेश्वरी अन रघुनाथ रात्री उशीरा पर्यंत उद्या काढायच्या चित्राची चर्चा करत होते.उपलब्ध रंग पुरेसे होते पण चित्राबद्दल एकमत काहीकेल्या होत नव्हते.शेवटी वेळेवर ठरवू म्हणून दोघही झोपायच्या तयारीत असताना त्यांना तीच स्त्री पुन्हा दिसली.राजेश्वरीने रघुनाथकडे बघितले अन दुसऱ्याच क्षणी ती हातात काठी घेऊन त्या स्त्रीचा पाठलाग करू लागली.यावेळी राजेश्वरी पुरती सावध होती त्यामुळे ती इकडे तिकडे बघत तिचा अचूक पाठलाग करत होती.तिच्या अपेक्षेप्रमाणे ती स्त्री सौधाच्या दिशेने जाऊ लागली.पायऱ्या चढता चढता अचानक दिसेनाशी झाली पण आज राजेश्वरीला नवल वाटले नाही,तिच्या नाहीसे होण्याची जागा अन युक्ती दोन्ही आता माहित झाले होते.राजेश्वरीने पण पायरीवर पाय ठेवला,पुढे जाणार तोच कुणीतरी हात धरला,राजेश्वरीने वळून बघितले,तिला आश्चर्य वाटले रघुनाथ तिच्या पाठोपाठ आला होता.राजेश्वरीने प्रश्नार्थक दृष्टीने त्याच्याकडे पाह्यले.रघुनाथ म्हणाला एकटी जाऊ नको मी पण येतो त्यावर राजेश्वरीने त्याला त्या दिवशी घडलेला प्रसंग थोडक्यात सांगितला आणी त्याला बाहेर थांबायला सांगितले जर उशीर झाला तरच रघुनाथने आत यायचे असे ठरले,रघुनाथने बरोबर एक जाड दोरी आणली होती,ती कमरेला बांधून राजेश्वरी पहिली पायरी चढली त्या कमळाला हात पोचतो का ते बघितले मग पुढच्या तीन पायऱ्या चढून ती कमळाची पाचवी पाकळी फिरवू लागली पायरी सरकली पण या वेळी राजेश्वरी सावध असल्यामुळे ती तोल जाऊन पडली नाही,पुढच्या अंधारात तिने हातातली काठी फिरवली,काहीतरी हलल्यासारखे दिसले,आता तिने पुन्हा काठी फिरवून ती हलणारी वस्तू हातात पकडण्याचा प्रयत्न चालवला,शेवटी एकदाची ती हलणारी वस्तू पकडण्यात तिला पूर्ण यश प्राप्त झाले.तो एक जाडसर दोरखंड होता जो तिथे मुद्दामच लटकत ठेवला होता हे उघड होते.दोरखंडाला धरून राजेश्वरी सुखरूप आत उतरली,पण इकडे बाहेर थोडा गोंधळ झाला होता.राजांच्या मित्रांपैकी कुणीतरी त्या स्त्रीला सौधाकडे येताना बघितले होते त्याने बाकीच्या मित्रांना उठवून इकडेच आणले होते.रघुनाथ पटकन एका दाट झाडाच्या मागे लपला.थोड्यावेळ शोधाशोध करून शेवटी सगळे झोपायला निघून गेले.राजेश्वरीची वाट बघत तिथेच थांबावे की पुन्हा खोलीत जाऊन झोपावे या संभ्रमात रघुनाथ बसल्याजागीच डुलकी घेऊ लागला.राजेश्वरी हातातली काठी सांभाळत हळूहळू पुढे जाऊ लागली.त्य दिवशी सारखीच प्रकाशाची तिरीप दिसू लागल्यावर आणखी सावधगिरीने पुढे पुढे जात असता आपण एका महालात येऊन पोचल्याचे कळल्याने ती थोडी घाबरल्या सारखी झाली.अचानक तिला काही माणस या दिशेनी येताना दिली दिसली.इकडे तिकडे बघून तिने एका सिव्हासनाच्या मागे लपणे पसंत केले.थोड्याच वेळात तो महाल पूर्ण भरून गेला.राजेश्वरी लपली होती त्या जागेवर कुणीतरी येऊन बसले अन दरबाराचे काम सुरु झाले.
सौ.उषा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)