शनिवार, ३१ डिसेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                   श्री                            ४४ 
 सुजयराजांबरोबर त्यांची लेक राजकन्या सुवर्णरेखा आली होती.महाराज सुदर्शन आणी महाराणी सुलक्षणा पण आज पुष्कळ वर्षानी ह्या राजमहालात आले होते.त्यांच्या पावलांच्या स्पर्शाने तो जुना राजमहाल अगदी फुलून आला होता.जिकडे तिकडे सेवकांची लगबग सुरु होती.रोज पहाटेच उठणारी राजेश्वरी नेमकी आज उशीरा उठली होती.सगळा राजपरिवार त्या दोघांनी काढलेले चित्र बघायला आला होता.महाराज सुदर्शन,महाराणी सुलक्षणा राजमहालात राजेश्वरी अन रघुनाथची वाट बघत होते.हे कळल्यावर रघुनाथ तडक राजमहालाकडे निघाला. राजेश्वरीला सगळं आटपून जायला थोडा उशीरच झाला.
                         राजेश्वरीने काढलेले राधा कृष्णाचे चित्र सगळ्यांना खूप आवडले.राजकन्या सुवर्णरेखा तर टाळ्या वाजवत म्हणाली ह्यातला कृष्ण अगदी सुजयराजांसारखा दिसतो आहे.पहिल्यांदाच रघुनाथला पण हे जाणवले आणी राजेश्वरी ती अगदी लाजून चूर झाली होती.सुजयराजे मिस्कील हसत होते,ते आज खरच खूप आनंदात होते एक तर त्यांचे आईवडील खूप वर्षानी इथे आले,त्यांची लेक जी कायम त्यांच्यावर रागावलेली असायची ती आज चक्क खुशीत होती,आणी ह्या सगळ्याला कारणीभूत होती ती राजेश्वरी ! तिनी आपली आवड अगदी जगजाहीर करून टाकली होती कालच चित्राद्वारे आपण विचारायच्या कितीतरी आधी!आपली निवड अगदी अचूक आहे हे त्यांना मनापासून पटले.
                       राजेश्वरीला पण आज प्रकर्षाने जाणवले की चित्रातला कृष्ण हुबेहूब सुजयराजांसारखा आहे.सुदर्शन महाराजांनी रघुनाथला विचारले की ते इथून कधी जाणार आहे म्हणजे जायच्या आधी त्यांनी महाराजांना भेटून जावे अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केल्यावर रघुनाथ आश्चर्याने थक्क झाला,एकीकडे सुजयराजे राजेश्वरीला लग्नाची मागणी घालून त्यांना इथे थाबायला सांगतात आणी दुसरीकडे महाराज विचारतात की कधी जाणार!रघुनाथचा गोंधळ सुजयराजांच्या लगेच लक्षात आला,ते झटकन पुढे झाले अन म्हणाले की महाराज मीच ह्या दोघांना इथे थांबण्याचा आग्रह केला आहे.कालच चित्र पूर्ण झालं आहे आता त्यांनी थोडे दिवस इथे विश्रांती घ्यावी अशी माझी इच्छा आहे.महाराजांनी लगेच मान हलवून रुकार दिला.राजेश्वरी पण ह्या प्रकाराने एकदम भानावर आली.म्हणजे ह्यांनी अजून कुणालाच काही सांगितलेले नाही तर.लग्नासारखा निर्णय स्वतःच्या माणसांपासून कसा काय लपवता येईल?ह्याचे रहस्य तातडीने शोधायला हवे हेच खरे.   
नवीन वर्ष सुख समृद्धीचे ,आरोग्याचे ,समाधानाचे जावो  ही मनःपूर्वक शुभेच्छा !सौ.उषा

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: उषा usha-ushagmailcom.blogspot.com: उषा usha-ushag...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: उषा usha-ushagmailcom.blogspot.com: उषा usha-ushag...: उषा usha-ushagmailcom.blogspot.com: उषा usha-ushagmailcom.blogspot.com: ... : उषा usha-ushagmailcom.blogspot.com: ...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: उषा usha-ushagmailcom.blogspot.com:               ...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: उषा usha-ushagmailcom.blogspot.com: ...: उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ... : श्री ...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com:                                           श्री    ...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ...: श्री ४३ राजेश्वरी खोलीत परत आली.रघुनाथ तिचीच वाट बघत होता.त...

किल्ल्याचे रहस्य

                                          श्री                                      ४३
राजेश्वरी खोलीत परत आली.रघुनाथ तिचीच वाट बघत होता.ती आल्या आल्या तो म्हणाला "अग थोडं माझ्या म्हातारपणाचा विचार कर मी दिवा घेऊन शोधला असता तरी मला तुझ्या करता इतका चांगला नवरा शोधता आला नसता,मी खर म्हणजे तुझ्या काळजीने जास्त थकलो आहे.पोरी माझे केस काही उन्हात पांढरे झाले नाही,सुजयराजांनी तुला पसंत केली ही तुझी पूर्व पुण्याई फळाला आली असं समज त्यांना नकार देण्याचा करंटेपणा करू नकोस."राजेश्वरीने निमूट सारे बोलणे ऐकून घेतले .ती फक्त इतकेच म्हणाली "बापू मला जे माहिती आहे ते तुला माहिती नाही पण लवकरच मी ह्यातून काहीतरी मार्ग काढीन".रघुनाथ मान फिरवून झोपून गेला.
                           आता सगळी जवाबदारी राजेश्वरीवर होती.कुठून सुरुवात करावी हेच तिला कळत नव्हते.तिला कुणाची मदत नको होती कारण तो कुणीतरी राजांचाच माणूस असेल अन तो आपल्याला खरे काय ते कळू देणार नाही असे तिला वाटत होते.आज दिवसभर दोघांनाही खूप शारीरिक आणी मानसिक ताण पडला होता.आज इथून निघून जायचं अस नक्की ठरवलं असता आज पुन्हा थांबावं लागलं होतं.या थांबण्यात कुठेतरी खूप आनंद होता पण एक बोच होती ती दूर झाल्या शिवाय,छे! या विचारचक्रातून बाहेर कसं पडायचं तेच कळत नाही राजेश्वरी उशीरा रात्री केव्हातरी झोपली.
                     रात्री लवकर झोपल्यामुळे रघुनाथ सकाळी लवकर उठला होता.जरा वेळाने सुजयराजे येताना दिसले म्हणून त्याने खोलीचे दार ओढून घेतले आणी तो बाहेर येऊन उभा राह्यला.सुजयराजांनी अभिवादन केले तेव्हा रघुनाथला फारच संकोचल्यासारखे झाले,त्यांची नजर राजेश्वरीला शोधात होती पण रघुनाथ मुद्दामच न कळल्यासारखे दाखवून दुसऱ्याच विषयावर बोलत होता.राजेश्वरी सुजयराजांचा आवाज ऐकून धडपडून उठून बसली होती पण ती पण बाहेर आली नाही,एकतर तिने कालचे नवे कपडे पण बदलले नव्हते ,म्हणजे तिला खरतर सुचलंच नाही कारण इतक्या दिवस तिच्याकडे मोजून दोन कपडे असायचे आणी एकदा ते अंघोळ केल्यावर अंगावर चढवले की पुन्हा बदलण्याकरता दुसरे कपडे नव्हते आणी त्याची गरज पण नव्हती.अर्थात आज राजेश्वरीला या गोष्टीची पहिल्यांदाच जाणीव झाली.बाहेर एक अजून आवाज ऐकू आला म्हणून न राहवून राजेश्वरी बाहेर आली.आलेल्या व्यक्तीला बघून राजेश्वरीच्या डोक्यात अकस्मात एक कल्पना आली आणी तिचा चेहेरा आनंदाने फुलून गेला तिला तिच्या मोहिमेत हवा तसा साथीदार मिळाला होता.
   नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !                                                                                                             सौ.उषा.

सोमवार, २६ डिसेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                           श्री                                    ४२
राजेश्वरी राजमहाल सोडून निघून गेली,सगळ्यांनाच नवल वाटलं .कुठली कोण हातावर पोट असलेल्या बापाची मुलगी अचानक राणी होणार ते भाग्य लाथाडून ही गेलीच कशी ?सुजयराजांचा चेहेरा पण उतरला होता.त्यांनी जरी राजेश्वरीला निर्णयाचा अधिकार दिला असला तरी त्यांना मनातून खात्री होती की नकार मिळणार नाही.मग ही अशी तडका फडकी निघून कशी गेली?रघुनाथला तर मेल्याहून मेल्या सारखे झाले होते.राजेश्वरीच्या विचित्र वागण्याचा त्याला जरी अनुभव होता तरी आयुष्यातली इतकी मोठी संधी ती अश्याप्रकारे ठोकरून लावेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.त्याला तिथून एकाएकी निघून पण जाता येत नव्हते.सगळ्यात आधी सावरला तो राजांचा एक इंग्रज मित्र,त्याने सुजय राजांना राधाकृष्णाच्या चित्रापुढे आणून उभे केले.राजेश्वरीने लाल अन पांढऱ्या दोन्ही रंगांची फुलं चित्रापुढे ठेवली होती. डोळ्यातल्या पाण्यामुळे धूसर दिणारे दृश्य सुजयराजांनी डोळ्यातले पाणी निपटून नीट बघितले.पूर्ण नकार नव्हता तर !त्यांच्या चेहेऱ्यावर पुन्हा नेहेमीचेच स्मित दिसू लागले. त्यांचा मित्र पण आनंदाने त्यांच्या पाठीवर थोपटू लागला.रघुनाथला हे काहीच समजले नव्हते सुजय राजांनी त्याला जायची परवानगी दिली अन रात्री भेटतो असे हळू आवाजात सांगितले.
                     राजमहालातून रघुनाथ तडक खोलीवर आला.थोड्या रागानेच त्याने हाक मारली राजेश्वरीला पण तिथे कुणीच नव्हते ही मुलगी आता गेली तरी कुठे ?रघुनाथ तिथेच खाली बसला.आज रघुनाथ तिला शोधायला जाणार नव्हता.त्याच्या पायात बळच उरलं नव्हतं.कुठून सुंदरपुरला यायची बुद्धी झाली असे आता त्याला वाटू लागले होते.

                       सगळ्या मित्रांचा निरोप घेऊन सुजयराजे घाईने निघाले.कधी एकदा राजेश्वरीला भेटतो असे झाले होते.खोलीकडे जाता जाता ते एकदम सौधाच्या दिशेने चालू लागले.राजांचा अंदाज अगदी बरोबर होता.राजेश्वरी एकटीच सौधावर उभी होती, हीच त्यांना हवी अशी अनुकूल संधी होती.सुजयराजांना तिथे बघून राजेश्वरीला अजिबात आश्चर्य वाटले नाही,जणूकाय दोघांचे आधीपासूनच भेटायचे ठरले होते. ती फक्त इतकेच म्हणाली माझे काही प्रश्न आहेत ज्यांची मला उत्तरं हवी आहे.सुजयराजे म्हणाले मी माखनला बोलावून घेतो,त्यावर राजेश्वरीने त्यांना सांगितले की माझ्या प्रश्नांची उत्तरं ह्याच राजमहालात सापडतील असे वाटते फक्त मला इथे माझ्या मनाप्रमाणे फिरण्याची मुभा द्यावी.सुजयराजे लगेच तयार झाले,फक्त तळघरात जाताना माखन किंवा केशर बरोबर असेल अशी काळजी घ्यायला सांगितले,राजेश्वरीच्या जीवाला धोका होऊ शकतो असे स्पष्टीकरण राजांनी दिले,थोड्याश्या अनिच्छेनी राजेश्वरीने होकार दिला.सुजयराजे अनिमिष नेत्रांनी राजेश्वरीकडे बघत होते.गडद अंधारात सुद्धा त्यांच्या नजरेनी राजेश्वरी अस्वस्थ झाली होती.ही भावना तिच्या करता सर्वस्वी नवीन होती,पण अजून तिला त्यात पुरतेपणी झोकून देता येत नव्हते कारण राणी सुकन्याचा चिरका,चिडका आवाज तिच्या कानात घुमत होता,"त्या सुजय राजाला चांगले पन्नास फटके मारा"का ? कश्याकरता पन्नास फटके मारायला निघाली होती ती ? हे गूढ उकलल्याशिवाय पुढचा विचार नको.
                                 सौ.उषा.