मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११

                                                    श्री                                     २4
                              रात्रभर राजेश्वरी झोपू शकली नाही.काही न  सांगताही तिच्या मनातली खळबळ रघुनाथने अचूक ओळखली.तिच्या डोक्यावर थोपटून तिला झोपवायचा त्याने प्रयत्न पण करून पाह्यला.तिच्या डोळ्यातले अश्रू पण त्याला दिसत होते.राजेश्वरीच्या हळव्या मनावर अचानक मोठा आघात झाला होता.आई नसल्याचे दुक्ख तिला चांगलेच माहीत होते.लहानग्या सुवर्णरेखेचा निरागस चेहरा तिच्या डोळ्या पुढून हलत नव्हता.तिच्या आक्रस्ताळ्या विचित्र स्वभावाचे हे खरे कारण होते.सुजय राजांबद्दल अतोनात घृणा तिला वाटू लागली.हे काम सोडून निघून जावे असेही आता तिला वाटू लागले. 
                            रघुनाथने सकाळी राजेश्वरीला उठवले तेव्हा सूर्य चांगलाच वर आला होता,पण अजूनही तिला उठून कामाला लागावे असे वाटत नव्हते.बळजबरीनेच रघुनाथ तिला जंगलात घेऊन गेला.इथे थोडे निवांत बोलता येणार होते.राजेश्वरीची प्रतिक्रिया रघुनाथला पण थोडी अनपेक्षित होती.आजवर इतक्या ठिकाणी काम केले पण ती कुठेही गुंतून पडली नव्हती.आपण बरे आपले काम बरे असाच तिचा स्वभाव होता मग आजच काय झाले?
                                 आजच काय झाले या प्रश्नाशी राजेश्वरी रात्रभर झगडत होती.फक्त सुवर्णरेखेच्या दुक्खाने उमटलेली प्रतिक्रिया ही नक्कीच नव्हती.स्वतःशी कबूल करायला धजत नव्हती राजेश्वरी पण हे तिचे पहिले प्रेम होते का?राजेश्वरीला आता स्वतःचा पण तिटकारा वाटायला लागला.कोण कुठला सुजयराजा अन त्याने आपले अवघे भावविश्व व्यापून टाकावे ?काय करू मी देवा कुठे जाऊ?स्वतःचे आरश्यातले प्रतिबिंब तिला आठवले शी! कळकट,घाणेरडे काही बरोबरी तरी आहे का आपली अन सुजयराजांची ? त्यांचा विचार झटकून टाकावा हेच आपल्या हिताचे आहे. आपल्याला काय करायचे आहे?करेना का तो खून त्याच्या बायकोचा,मुलीचा,आपण बरे आपले काम बरे.बापू म्हणतो तेच खरे या मोठ्यांच्या छोट्या गोष्टी आहेत ज्यात आपण लक्ष न घालणेच हिताचे ठरेल.  
                                 सौ.उषा.                   

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री २३ पहाट...
                                                    श्री                                                २३
                           पहाटे लवकर उठून दोघही बापलेक जंगलाकडे निघाले.हातात टोपली काठी अशी नेहेमीच  सामान होत.रानात मुबलक फुलं मिळाल्याने दोघही खूष होते.रमत गमत चालणे फारसे सोयीचे नव्हते हे लक्षात येऊन दोघं झपाझप चालू लागले.
                            किल्य्याच्या डागडूजीचे  काम सुरु झाले होते त्याचा गलका दूरवर रघुनाथ अन राजेश्वरीला ऐकू येत होता.तिथल्या शांत वातावरणात हा आवाज जरा जास्तच मोठा वाटत होता.डोक्यावर भली मोठी टोपली अन हातात काठी अश्या अवतारातल्या राजेश्वरीकडे लक्ष जाताच सगळीच माणस तिच्याकडे पाहू लागली.राजेश्वरी आपल्याच तालात पुढे निघून गेली.जास्वंद,झेंडू,गोकर्ण,कृष्णकमळ,कुंद,शेवंती अश्या सगळ्याच फुलांचा संमिश्र सुवास आसमंतात पसरला होता.खोलीत पण रंगाचा उग्र दर्प होता.त्या दोघांनाही या वासाची सवय होती पण बाकीच्या माणसांना मात्र हा सगळा वास त्रासदायक वाटत होता आणी त्याच बरोबर रघुनाथ अन राजेश्वरीचा इतक्या दूर राहण्याचा निर्णय किती बरोबर होता हेही पटत होते.
                         दुपारी स्वैपाक होईपर्यंत दोघांचेही काम सुरूच होते.महालातल्या सगळ्या भिंती खरवडून एकसारख्या करण्याचे काम तीन चार दिवस तरी पुरणार होते,राजेश्वरीने स्वतःच ते काम करायला घेतले,तिचा हात भरभर चालत होता.रघुनाथने मोठ्या रांजणात निळा रंग तयार करून ठेवला होता.कुठले चित्र काढायचे ते अजून काहीच ठरले नव्हते.बाहेर बराच आवाज ऐकायला आला म्हणून रघुनाथ बाहेर डोकावला तर सुजयराजे अन राजकन्या सुवर्णरेखा महालाच्या दिशेने येताना दिसले.त्याने हळू आवाजात राजेश्वरीला सूचना दिली.सुवर्णरेखा  खूप दिवसांनी या महालात आली होती ती सगळीकडे काहीतरी शोधत होती.एकाएकी ती राजेश्वरी जवळ येऊन उभी राह्यली.राजेश्वरीचा मळका झगा घट्ट धरून ती जोरात ओरडली "तुला माहीत नाही पण मला माहीत आहे या माणसाने माझ्या आईला मारून टाकले सुजय राजांकडे ती रागारागाने पाहत होती.सुजयराजे हतबल होऊन तिच्याकडे पाहत होते.पाहता पाहता सुवर्णरेखा हमसून हमसून रडू लागली.रडता रडताच ती म्हणत होती या माणसाने माझ्या आईला मारले मला हा माणूस अजिबात आवडत नाही.राजेश्वरी नकळत राजकन्येला थोपटू लागली.तिच्या स्पर्शातल्या प्रेमाने राजकन्या तिला बिलगून आणखीच जोरात रडू लागली.एक तीक्ष्ण नजर सुजयराजांवर टाकून ती राजकन्येला घेऊन बाहेर पडली.थोड्यावेळाने राजकन्येला घेऊन सुजयराजे तर निघून गेले पण राजेश्वरीच्या मनात विचारांचा धुरळा उडवून !लहान मुलं खोटं बोलत नाही अन प्रत्यक्ष बापाबद्दल कोण कशाला बोलेल खोटं.एका देखण्या चेहेऱ्याच्या मागे असे कुरूप मन आहे म्हणायचे.सुजयराजांबद्दल विचार करकरून राजेश्वरीचे डोके दुखायला लागले.झोप येत नव्हती अन आपण एव्हढा विचार का करतो आहे हे पण कळत नव्हतं.
                                                               सौ.उषा.

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री 22 रघुनाथला कोणालाच काही सांगायची गरज पडली...
                                                  श्री                                          22
रघुनाथला कोणालाच काही सांगायची गरज पडली नाही,बहुदा राजांनीच सगळ्यांना स्पष्ट शब्दात त्या दोघांच्या वेगळेपणाची जाणीव करून दिली असावी कारण दोघं खोलीत आले तेव्हा त्यांचेच फक्त सामान त्या खोलीत होते.बाजूला रंगांच्या खोलीत सुद्धा कोणी सामान ठेवले नव्हते.
                           राजेश्वरीने दोघांचा स्वैपाक जेवण आटोपल्यावर पुन्हा त्या महालाकडे मोर्चा वळवला.रघुनाथ थोडी विश्रांती घेऊन येणार होता.अजूनही त्याची तब्बेत तितकीशी बरी नव्हती,राजेश्वरीने मुद्दामच बरोबर इतर कुणाला घेतले नव्हते.कुठलेही काम एकाग्र होऊन करण्याचा तिचा स्वभाव होता.काम करताना उगीच बडबड करून कामाचा विचका होतो असं तिचं ठाम मत होतं.डोक्यावर अन तोंडावर ओढणी घट्ट बांधून तिने आधी तिथली धूळ झाडून काढली,केव्हढा मोठा महाल हा !काय करायचं काय इतक्या मोठ्या खोलीच?आपल्याला अन बापूला किती लहान जागेत सर्व गरजा भागवता येतात या माणसांना का लागतात इतक्या मोठ्या खोल्या? काम करता करता एकीकडे तिचे विचारचक्र सुरु होते.धूळ जसजशी नाहीशी होऊ लागली तसतशी खालची काळी फरशी दिसू लागली.रघुनाथ येईतो राजेश्वरीने फरशी स्वच्छ धुऊन काढली होती.पुन्हा रंगाचे डाग पडणारच आहेत असं म्हणत रघुनाथ आत आला.राजमहाल खरच छान दिसत होता.
                        रघुनाथने बरोबर सगळे सामान आणले होते ते एका बाजूला रचून ठेवले.शिडी घेऊन त्याने पूर्वेकडील भिंतीपासून कामाला सुरुवात केली.भिंत खरवडून एक सारखी करण्यात त्याचा कितीतरी वेळ जाणार होता अन राजांना एक महिन्याच्या आत सारे काम पूर्ण करून हवे होते.जाऊदे कामावर लक्ष ठेवावे जेव्हडे होईल तेव्हडे तरी करावे. राजेश्वरीकडे  त्याचे लक्ष गेले पार दमलेली दिसत होती,हिचा स्वैपाकाचा वेळ वाचवता आला तर तो वेळ इथल्या कामात उपयोगी पडेल.मनात विचार आल्याबरोबर त्याने राजेश्वरीला हा विचार बोलून दाखवला थोड्या नाराजीनेच ती तयार झाली.रात्री झोपायच्या आधी तिने वाड्यावरचा सेवक माखनला उद्यापासून आम्हा दोघांचे दोन्ही वेळचे जेवण बाकी सगळ्यांबरोबर असेल हे सांगितले.माखनला राजांनी मुद्दामच इथे राह्यला सांगितले होते.तो त्यांचा अत्यंत विश्वासू माणूस होता.
                        रात्री दोघं बापलेक दिवसभराच्या थकव्याने लगेच झोपले.उद्या पुन्हा जंगलात फेरफटका मारावा लागणार होता.आधी तयार केलेले रंग उपयोगात आणता येतील पण ते पुरेसे नव्हते राजेश्वरीच्या स्वप्नात गहिरे रंग भरू लागले होते.
                                                               सौ.उषा.


                                                  

रविवार, २० नोव्हेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com:                                    श्री           ...

usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ...: श्री 21 राजेश्वरीने ती रात्र कशीतरी काढली.बापुची काळजी ...
                                   श्री                                21
                 राजेश्वरीने ती रात्र कशीतरी काढली.बापुची काळजी तिला झोपू देत नव्हती.तो इथेच असता तर बरं झालं असतं.त्याचे पाय चेपून देणे,औषध देणे सगळेच सोपे झाले असते.सकाळी ती सगळ्यांच्या आधी उठून अंघोळ वगैरे करून तयार झाली.आज सुजयराजे स्वतः येऊन त्यांना तो महाल दाखवणार होते.बाकीची मंडळी पण सुचेल ते काम करू लागली.प्रत्येकालाच सुजयराजांवर आपली छाप पडावी असं वाटत होतं.कालच्या घटनेनी सगळ्यांनाच आशा वाटू लागली होती.राजेश्वरीच्या उद्धटपणाबद्दल तिला सुजयराजांनी कुठलीच शिक्षा केली नव्हती उलट जास्त जवाबदारीचे काम सोपवून तिचा गौरवच केला होता ह्याचे सगळ्यांनाच नवल वाटत होते.
                      राजेश्वरी पायऱ्या चढून थेट सौधावर उभी होती.सुजयराजे आल्या शिवाय तिला कामाची दिशा ठरवता येत नव्हती.इतक्या उंचावरून सभोवतालचे रमणीय वातावरण तिच्यातल्या कलाकाराला आनंदित करीत होते.सगळीकडे हिरवा रंग दाटून राह्यला होता.क्षितिजावर हिरव्या निळ्या रंगाची गुंफण फारच मनोहारी होती.दूरवर दिसणारे नदीचे क्षीण पात्र उन्हात छान चमकत होते.खालचा माणसांचा आवाज पण वर येईतो अगदी कुजबुज केल्यासारखा येत होता.ही शांतता राजेश्वरीची बाल मैत्रीण होती.ह्या शांततेचा भंग केला तो एका गंभीर आवाजाने.सुजयराजे केव्हा आले हे पण तिला कळले नाही इतकी ती विचारात गढून गेली होती.ही जागा आहेच तशी कुणालाही आवडावी अशीच,तुम्ही इथे असल्याचे कळले म्हणून मी इथे आलो,सुजयराजांच्या शब्दांनी राजेश्वरी अगदी संकोचून गेली,ती हळू आवाजात म्हणाली कुणालाही पाठवून बोलावले असते तरी चालले असते आपण स्वतः कशाला कष्ट घेतले, सुजयराजे यावर फक्त हसले अन तिला खाली चलण्याची खूण केली.
                         राजेश्वरी अन रघुनाथ फक्त दोघांनाच बरोबर घेऊन राजे झपाट्याने निघाले.एका महाला जवळ आल्यावर ते थांबले,इकडे तिकडे बघून त्यांनी झटकन आत प्रवेश केला.रघुनाथ अन राजेश्वरी पण आत शिरले.सगळीकडे धुळीचे साम्राज्य होते,पण सुजयराजे फुलांच्या पायघड्या घातल्या सारखे चालत होते,तंद्रीत असल्यासारखे.या खोलीत पण एक आरसा होता,अर्थातच धुळीने माखलेला!राजांनी तो आरसा अलगद खाली काढून ठेवला.दोघांकडे वळून म्हणाले तुमचे काम या महालात करायचे आहे.भिंतीवर कुठला रंग ,कुठले चित्र याचे तुम्हा दोघांना पूर्ण स्वातंत्र्य असणार आहे फक्त आजपासून एक महिन्याच्या आत काम झाले पाहिजे आणी हा जो आरसा मी खाली काढून ठेवला आहे तो इथल्या भिंतीवर पुन्हा लागला पाहिजे.जितक्या झपाट्याने राजे आले तितक्याच झपाट्याने ते निघूनही गेले.रघुनाथ राजेश्वरीला घेऊन तिथून बाहेर पडला.आज काही करून आपली खोली पुन्हा मिळवली पाहिजे म्हणजे राजेश्वरीशी निवांत बोलता येईल.
                                      सौ.उषा.