गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

                                               श्री                                             १८
          सुजयराजे इतक्या झपाट्यानी आपल्या महालाकडे आले की सुदर्शन महाराज त्यांना काही सांगूच शकले नाही.युवराजांची आनंदी मुद्रा पाहून महाराजांचा जीव भांड्यात पडला.आता महालात चांगलीच गर्दी झाली होती.सगळे राजेश्वरीच्या चित्राची खूपच तारीफ करत होते.रघुनाथला पण हे ऐकून आनंद झाला.
                           राजेश्वरीची अवस्था मोठी विचित्र झाली होती.ती इतक्या दिवस रघुनाथ सारख्या कलाकाराची मदतनीस होती,तिच्या कानांना आपल्या वडलांचे कौतुक ऐकायची लहानपणापासून सवय होती,पण आज इतका सगळा समुदाय फक्त तिचे कौतुक करत होता.
                          शिडीवरून खाली उतरून तिने महाराज आणी युवराज दोघांना नमस्कार केला.युवराजानी तिला आपल्या कंठातला मोत्याचा हार बक्षीस देऊ केला,इथे पुन्हा सगळ्यांना राजेश्वरीचे वेगळेपण उठून दिसले कारण राजेश्वरीने नम्र शब्दात हार स्वीकारायला नकार दिला.ती म्हणाली की आमचे असे भटके जीवन आहे की त्यात या वस्तूंचा आम्हाला उपयोग होण्यापेक्षा उपद्रव होण्याचीच शक्यता जास्त आहे.मी कधीही महागडे कपडे आणी दागिने घातले नसल्याने त्यांची देखभाल करण्याची सुद्धा मला सवय नाही तरी मला या बाबतीत कुणीही आग्रह करू नये.सुजय राजांनी तिला ताबडतोब काम थांबवण्याचा हुकुम सोडला.
                               दुपारी स्नान जेवण आटोपल्यावर राजेश्वरीला सुदर्शन महाराजांच्या महालात येण्याची आज्ञा मिळाली.रघुनाथ पण राजेश्वरी बरोबर महाराजांच्या महालात आला होता.त्याने महाराजांची परवानगी घेऊन एका खांबा जवळ बैठक मारली.महाराज सुदर्शन महाराणी सुलक्षणा आणी सुजयराजे समोर बसले होते.

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

                                       श्री                                              17                                    रंगकाम करण्यात राजेश्वरी खूप निष्णात होती असे नाही पण रघुनाथच्या हाताखाली ती चांगली तयार झाली होती.तिचा आत्मविश्वास अव्वल दर्जाचा होता.यशस्वी होण्याकरता जरूरी मेहनत करण्यात ती कुणालाही हार जाणार नव्हती.मुख्य म्हणजे ती स्पष्टवक्ता असूनही विनम्र होती.
                           रघुनाथ,रंगाचं साहित्य यांना नमस्कार करून राजेश्वरीने कामाला मोठ्या उत्साहाने सुरुवात केली.तिच्या हातात फक्त दीड दिवस होता तिच कौशल्य सिद्ध करण्या करता.सगळ्या भिंतींना हलका पिवळा रंग रघुनाथने लावला होता.एक बाजू अर्धवट राह्यली होती ती राजेश्वरीने पूर्ण केली.कुठलं चित्र सुजय राजांना आवडेल? राजेश्वरीचा हात भरभर काम करत होता.भिंतीवर चित्राचा आराखडा तयार करून तिने अभिप्राय विचारण्याकरता रघुनाथकडे पाह्यले तो पुन्हा ग्लानीत होता,तिला थांबायला वेळ नव्हता.सारा दिवस न खाता पिता ती अहोरात्र काम करत होती.चित्र पूर्ण होणे निव्वळ अशक्य होते.पहाटे सुदर्शन महाराज स्वतःच सुजय राजांच्या खोलीत आले,समोरचे चित्र बघून ते थक्क झाले.वा !अर्धवट चित्र इतके सुंदर दिसते आहे तर पूर्ण झाल्यावर किती छान दिसेल !राजेश्वरी पोरी तू खरोखर एक उत्तम कलाकार आहेस.तुला ओळखण्यात आम्ही कमी पडलो हे कबूल करायला आम्हाला जराही संकोच वाटत नाही.चित्राकडे एकटक बघत महाराज एव्हढ बोलून थांबले अन आपल्याच विचारात दंग झाले.राजेश्वरी हात जोडून समोर उभी होती.इतक्यात महाराज एकाएकी आठवण झाल्यासारखे म्हणाले हे चित्र खूप छान आहे पण सुजय राजांच्या खोलीत छे बुवा मी आधीच सांगायला हवे होते.बावरलेल्या राजेश्वरीला गोंधळात ठेवून ते माघारी वळून निघून पण गेले.चित्राचं काय करायचं तेच तिला कळेना.डोळ्यावर झोपेचा अंमल चढू देण्यापूर्वीच तिने स्वच्छ गार पाण्याचा हबकारा तोंडावर, डोळ्यावर मारला.थोड्यावेळ विचार करून तिने पुन्हा चित्र पूर्ण करण्याचा निश्चय केला.
                      राजेश्वरी कितीवेळ चित्रात गुंतली होती हे तिलाच कळल नाही.ती भानावर आली तीच मुळी वा !अप्रतिम !अति सुंदर !या शब्दांनी.महालाच्या दारातून आत येत एक अत्यंत देखणा तरुण तिच्या चित्राची मुक्त कंठाने तारीफ करत होता. 

usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com:                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com: ...: usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ... : श्री ...

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०११

                                                 श्री                                         16
                         राजेश्वरी नमस्कार करून किती तरी वेळ उभी होती.महाराज म्हणाले ही झाडं कुणी लावली?अन हे कारंज हे कुणी सुरु केलं?त्यांना खर म्हणजे या प्रश्नाच उत्तर माहीत होतं,राजेश्वरी घाई घाईने स्पष्टीकरण देऊ लागली,इथे फारच गवत वाढलं होतं,कारंजात कचरा कुजून घाण वास येत होता,मनातल्या मनात राजेश्वरी चांगलीच घाबरली होती कारण ही जागा आपली नसताना त्यात आपण मूळ मालकाला न विचारता बदल केले हे आपलं चुकलच आहे ह्या विषयी तिला अजिबात शंका वाटत नव्हती,पण अश्या अडचणीच्या प्रसंगी बापू पण बरोबर नाही.सुदर्शन महाराज एकटेच कसे काय आले?तिच्या मनातले सगळे प्रश्न समजल्या सारखे महाराज बोलू लागले.
                                  महाराज म्हणाले की राजेश्वरीचे त्यांना फार कौतुक वाटले.आता अर्थातच महाराज वेगळ्याच कारणाने तिथे आले आहेत.मग महाराजांनी तिला रघुनाथच आजारपण,सुजय राजांच्या खोलीचे अर्धवट राहयलेले रंगकाम.रघुनाथने सुचविलेले राजेश्वरीचे नाव अन त्याला महाराजांनी केलेला विरोध असं सगळं तपशीलवार सांगितलं अन मग महाराज म्हणाले की रंगकाम करण्याचा राजेश्वरीला कितपत अनुभव आहे माहीत नाही पण तरी सुजय राजे येण्याची वेळ अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे ते तिला ही संधी देऊ इच्छितात.
                                राजेश्वरीचा थोड्यावेळ स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना,जरा वेळाने तिने ही जवाबदारी घ्यायला तयार असल्याचे महाराजांना सांगितले.महाराजांनी तिला लगेच राजवाड्यावर येण्याचा हुकुम सोडला,राजेश्वरीने नम्र शब्दात त्यांना जाणीव करून दिली की इथे रघुनाथने तयार केलेला रंग आहे आणी तोच बरोबर नेणे आवश्यक आहे.महाराजांनी तिला गाडीतून सर्व सामान घेऊन येण्यास सांगितले.राजेश्वरीकरता राजवाड्यातून गाडी जाणार हे राजवाड्यात सगळ्यांनाच समजले.प्रत्येकाला राजेश्वरीचा कौतुक मिश्रित हेवा वाटू लागला.

usha-ushagmailcom.blogspot.com:                                             श्री  ...

usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ...: श्री १५ पुढचे आठ दिवस रघुनाथचे फारच धांदलीचे गेले.सुज...

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

                                            श्री                                          १५
पुढचे आठ दिवस रघुनाथचे फारच धांदलीचे गेले.सुजय राजांची खोली आधी रंगवायला घ्यायची होती.त्याला एकट्याला हे झेपणार नव्हते.सुदर्शन महाराजांची भेट घेऊन त्याने राजेश्वरीची या कामात मदत घेण्या विषयी त्यांना विचारले कारण रघुनाथ आणखी कुणावर या कामात विश्वास ठेवायला तयार नव्हता.सुदर्शन महाराजांनी स्पष्ट नकार दिला अन पुन्हा या बद्दल न विचारण्याची ताकीद पण दिली रघुनाथला.महाराजांनी एकवार संधी देऊन बघावी असे विनवूनही महाराज तयार झाले नाहीत एकतर कुणा पोरी बाळींचे हे काम नाही अन सुजय राजांची चोखंदळ आवड निवड जपणं हे राजेश्वरीला नकीच झेपणारं काम नाही असं महाराजांच सुस्पष्ट मत ऐकल्यावर रघुनाथ चुपचाप कामाला लागला.
                                    सतत पाच सहा दिवस काम करून शेवटी व्ह्यायचे तेच झाले.रघुनाथला सडकून ताप भरला अन तो अति थकव्यामुळे त्या दिवशी घरी पण जाऊ शकला नाही.पूर्ण रात्र तो अर्धवट बेशुद्धीत राजेश्वरीची काळजी करत राह्यला,पहाटे कधी तरी त्याला झोप लागली.सकाळी महाराजांच्या कानावर हे पडल्यावर त्यांनी ताबडतोब रघुनाथची भेट घेऊन त्याला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले.सुजय राजांच्या महालाची काळजी होतीच,इतक्या वेळेवर दुसरा चांगला माणूस मिळणं कठीणच होतं द्यावी का राजेश्वरीला संधी या विचारासरशी त्यांनी घोड्यावर बसून किल्ल्याकडे कूच केले.इतक्या मोठ्या वास्तूत भली भली पुरुष मंडळी सुद्धा घाबरली असती,बिचारी राजेश्वरी ,कशी काढली असेल तिनी रात्र ?
                   सुदर्शन महाराज आज पुष्कळ दिवसांनी आले होते.घोड्यावरून खाली उतरून ते हळूहळू मारोती मंदिराजवळ आल्यावर स्वच्छ मंदिर अन नुकतीच देवपूजा करून फुलं व्हायलेली बघून प्रसन्न झाले.काही माणसांना सांगूनही काम जमत नाही अन काही न सांगता कितीतरी काम मोबदल्याची अपेक्षा न ठेवता करतात.तिथून पुढे आल्यावर त्यांना आणखी एक आनंदाचा धक्का बसला छोटीशीच फुलबाग अन कारंजाचे उडणारे तुषार आज किती वर्षानी बघायला मिळाले.सगळ्या परिसरावर पसरलेलं उदास सावट रघुनाथ अन राजेश्वरीने त्यांच्या पुरते का होईना पुसून काढले होते.तेवढ्या भागात फक्त आनंद होता.राजेश्वरी समोर येऊन उभी राह्यली तरी महाराज किती तरी वेळ आपल्याच विचारात दंग होते.